मुंबई – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाच्या उद्घाटनाची माहिती केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिली हि माहिती देतांना ते म्हणाले, या सोहळ्याला मुख्यमंत्री असावेच असं काही नाही. त्यांचा या विधांनावर आता शिवसेना नेत्यांकडून टीका केली जात आहे.
यातच णीपुरवठा मंत्री शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांनी राणे कुटूंबियांवर पलटवार केला आहे. शिवसेना येड्याची आहे म्हणणारे नितेश राणे यांनी हे लक्षात घ्यावे या जत्रेत नारायण राणे देखील होते, मग ते महायेडे होते का? असा सवाल त्यांनी विचारला आहे.
तत्पूर्वी, शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी यावरून राणेंना खोचक टोला लगावला आहे. ते म्हणाले, हा प्रकल्प पूर्णपणे महाराष्ट्राचाच आहे, असं सांगतानाच आता जे बडेजाव मारतात, फुशारकी मारतात ते म्हणतात मुख्यमंत्र्यांना बोलवण्याची गरज नाही. तुम्ही कोण सांगणारे? तुम्हाला कोणी अधिकार दिला? काही माहीत नसेल तर चार लोकांना विचारा. सोयीसाठी अमित शहांना विचारा. तुम्हाला काय अधिकार? काल टिंगूमिंगू सांगत होते बाप असावा तर असा. असावा. पण तो आयत्याबिळावरचा नागोबा नसावा, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.