मुंबई – कोकणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. चिपळूण आणि महाड येथील पूरस्थितीने रौद्र रुप धारण केले आहे.
हजारो लोक पुराच्या पाण्यात अडकले आहेत. बचाव आणि मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. त्यातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्री ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असल्याने परिस्थिती आणखीन बिकट होत असल्याचे दिसत आहे.
अशी परिस्थिती असतांना पालकमंत्र्यांनी तिथे थांबून जनतेला मदत करायला हवी. पण पालकमंत्री एका रात्रीत मुंबईला पळ काढतात. हे पालकमंत्री नाही तर हे पळपुटे मंत्री आहेत, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
चित्र वाघ यांचे ट्विट
आस्मानी संकटामुळं चिपळूणचे नागरिक
अन्न-पाण्यावाचून तडफडतायेत एवढचं नाही तर पुरामुळे दवाखान्यातून ॲाक्सिजन पुरवठा रद्द झाल्याने एकाच दिवशी ८ कोविड रूग्ण दगावले अशा वेळेस पालकमंत्री म्हणून जनतेच्या पाठीमागे खमकेपणाने उभं राहण्याऐवजी @advanilparab रात्रीतून मुंबईला पळ काढतात (१/२) pic.twitter.com/h8oIWuIk6C— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 24, 2021