कोल्हापूर – मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीआणि महसूलमंत्री यांनी पाच दिवसासाठी कोल्हापुर शहरातील निर्बंध हटवले आहेत. आज सोमवार (५ जुलै ) पासून अत्यावश्यक सेवांबरोबरच इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सुरू ठेवण्यासाठी परवानगी दिली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/325208762404480
ही परवानगी सोमवार ते शुक्रवार (५ ते ९ जुलै ) या पाच कालावधीमध्ये सकाळी ७ ते सायंकाळी ४ या वेळासाठी देण्यात आली आहे. तथापि पाच दिवसानंतर पुन्हा परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे कोल्हापुर शहरातील नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून गर्दी करू नये,सुरक्षेचे सर्व नियम पाळावेत , असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली आहे.