इस्लामाबाद, दि. 7- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचा हवाला देऊन परदेशात असलेल्या पाकिस्तानी दूतावासांना चांगलेच सुनावले आहे. त्यांनी आपल्या राजदूतांना ब्रिटिशकालीन मानसिकता सोडून पाकिस्तानी वंशाच्या लोकांशी संवेदनशीलपणे व्यवहार करण्याची सूचना दिली आहे. भारतीय दूतावासांच्या मेहनतीची प्रशंसा करत इम्रान खान यांनी म्हटले आहे की, जगभरातील भारतीय दूतावास परदेशी गुंतवणूक आणण्यात खूप सक्रिय आहेत.
जगभरात पसरलेल्या पाकिस्तानी दूतावासांना संबोधित करत इम्रान खान यांनी परदेशात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांशी होत असलेल्या दुर्व्यवहारांबद्दल आणि देशात परदेशी गुंतवणूक आणण्यात अयशस्वी ठरलेल्या दूतावासांना खडे बोल सुनावले. इमरान म्हणाले, “आपण अशाच पद्धतीने काम करत राहू शकत नाही.
ज्याप्रकारे दूतावास काम करत आहे ते काम ब्रिटिशांच्या काळात चालत असे, आजच्या पाकिस्तानध्ये चालू शकत नाही.’ इम्रान खान म्हणाले, दूतावासांचे सर्वात महत्त्वाचे काम असते परदेशात असलेल्या पाकिस्तानी लोकांची सेवा करणे. यानंतर त्यांनी देशात परदेशी गुंतवणूक आणण्याचे काम करायला हवे जो सध्या गंभीर आर्थिक संकटाशी लढत आहे.’ त्यांनी भारतीय दूतावासांची प्रशंसा करताना म्हटले की पाकिस्तानच्या तुलनेत ते आपल्या देशात परदेशी गुंतवणूक आणण्यात जास्त सक्रिय आहेत.