मुंबई – बांगालदेशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात मी सहभागी झालो होतो. माझ्या जीवनातील हे पहिलंच आंदोलन होतं. मी 20-22 वर्षाचा असेल. त्यावेळी माझ्यासह माझ्या अनेक सहकाऱ्यांनी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते बांगलादेशमध्ये बोलत होते. यावर काँग्रेसकडून टीका करण्यात आली आहे. बांगलादेश मुक्तीसाठी मोदी किंवा भाजपच्या नेत्यांनी संघर्ष केल्याचा कुठेही उल्लेख नसल्याचं काँग्रेससने म्हटलं आहे.
बांगलादेशाच्या स्वातंत्र्य दिनाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी बांगलादेश स्वातंत्र्याविषयी मोठं विधान केलं आहे.
बाल नरेंद्रच्या लीला आगाध होत्या. ते क्षणात पाकिस्तान तर कधी बांगलादेशमध्ये पोहचू शकत होते. त्यांनी पाकिस्तानात देखील संघर्ष केला असावा. मोदींनी चहा विकला पण त्यांच्या हातून चहा पिणारा कोणी भेटत नाही. त्यांच्यासोबत शिक्षण घेणारं कोणी सापडलं नाही. त्यामुळे त्यांच्या लीला अगाध, अदृश्य असतात, असा उपरोधिक टोला काँग्रेसनेते सचिन सावंत लगावला आहे.
बाल नरेंद्र यांच्या अगाध आणि अदृश्य लीला केवळ मोदींच्या दिव्यदृष्टीने दिसू शकतात. बांग्लादेशमुक्ती संग्रामात भारतात तर कोणी जेलमध्ये गेले नाही. पण मोदी दिव्यशक्तीने तत्कालीन पाकिस्तानात जेलमध्ये गेले असावेत. मोदींच्या हातून चहा पिणारा व त्यांच्याबरोबर डिग्री घेणारा अदृश्यच आहे https://t.co/SwkVELKKuT
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) March 26, 2021
मुळात बांगलादेश मुक्तीसाठी भाजपच्या कोणालाही सत्यागृह करण्याची गरज पडली नाही. इंदिरा गांधी यांच्या कणखर नेतृत्वामुळं पाकिस्तानचं विभाजन होऊन बांगलादेशची निर्मिती झाली. माजी पंतप्रधान अटल बिहार वाजपेयी यांनी देखील इंदिरा गांधी यांचा उल्लेख ‘दुर्गा’ असा केला होता. त्यावेळी अटलजींच्या भाषणात बांगलादेश मुक्तीसाठी मोदींचा किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्याच्या संघर्षाचा उल्लेख नसल्याची वस्तुस्थिती असल्याचं सावंत यांनी म्हटलं.