– प्राचार्य डॉ. पांडुरंग मिसाळ
तैसा वाग्विलास विस्तारूं । गीतार्थे विश्वभरूं । आनंदाचे आवारूं । मांडूं जगा ।।
दिसो परतत्व डोळां । पाहो सुखाचा सोहळा । रिवो महाबोधसुकाळा । माजीं विश्व ।।
श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीमधील 13 व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराज यांनी श्रीमद्भगवत गीतेतील 700 श्लोकावर 9033 ओव्यांचे भाष्य केले. गीतेतील सर्व तत्त्वज्ञान मराठीत आणले. “तिच्यावरील आदर प्रेम व्यक्त करताना तिच्या योग्यतेप्रमाणे मी वाणीचा विस्तार करून, अविष्कार गीतेच्या ज्ञानाने हे विश्वच भरून टाकणार आहे.
ज्ञानाची मेजवाणीची आनंदाची ताटच भरून विश्वामध्ये मांडणार आहे. या डोळ्यांनी तो सुखाचा सोहळा हा गीतेचा बोध जगाला महासुखाचे दाखविणार आहे.’ यामधून गीता व ज्ञानेश्वरी ह्या दोन्ही ग्रंथांबद्दल असणारे विशेषप्रेम व आत्मविश्वास दिसून येतो. ते ह्या दोन्ही ग्रंथाचे फल, प्रयोजन, उद्दिष्ट सांगतात. तेव्हा आपणही हे ज्ञानप्राप्त करून हा आनंद घ्यावा.