नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2021 -22 या वर्षासाठीचा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प संसदेत नुकताच सादर केला आहेत. या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षासह मविआ सरकारनेही नाराजी व्यक्त केली . याच संजय राऊत यांनी या मुद्यावरून खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत असा टोलाही लगावला. त्यांच्या या टीकेला आता भाजपचे भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत उत्तर दिले आहे.
अतुल भातखळकर म्हणाले,’जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा.’ असं ट्विट करत संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
तत्पूर्वी, देशाला सर्वात जास्त महसूल महाराष्ट्र व मुंबईतूनआकडे अर्थमंत्री देत आहेत मिळतो मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काहीही मिळालेल नाही. अशी टीका त्यांनी केली होती. तर
केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या वाट्यातील जीएसटीचे पैसे लवकरात लवकर द्यावेत. म्हणजे आम्हाला कोरोनाच्या संकटातून अर्थव्यवस्था बाहेर काढता येईल. तसेच सर्व सामान्यांना कोरोनाची लस मोफत देण्यासंदर्भातही विचार झाला पाहिजे.’ अशी अपेक्षा संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.