नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर शेतकरी आंदोलनाचे केंद्रस्थान असलेल्या दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर पुन्हा एकदा संघर्षाची ठिणगी पडली आहे. एका जमावाने स्थानिक असल्याचा दावा करत शेतकऱ्यांविरोधात आंदोलन सुरू केले. यावेळी जमावाने शेतकऱ्यांवर दगडफेक करत तेथील तंबू उद्धवस्त करण्याचा प्रयत्न केला. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असून, तणाव निर्माण झाला आहे.
#WATCH: Delhi Police hit a protesting farmer after he attacked a Police personnel, dragging him to the ground along with him. Visuals from Singhu border.
(Note: Abusive language) pic.twitter.com/gILDF9OPA1
— ANI (@ANI) January 29, 2021
प्रजसत्ताक दिनी झालेल्या हिंसाचारानंतर एका जमावाने शेतकऱ्यांनी सिंघू बॉर्डर रिकामी करावी, अशी मागणी करत आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे. या आंदोलकांनी आपण येथील स्थानिक असल्याचा दावा केला, शेतकरी आंदोलनादरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
शेतकरी आंदोलनाविरुद्ध स्थानिकांचे आंदोलन सुरू असताना अचानक वादाची ठिणगी पडली. आणि दोन्ही बाजूंनी दगडफेक सुरू झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं लक्षात येताच सुरक्षा जवानांनी लाठीमार करत अश्रुधूरांच्या नळकांड्या फोडल्या.
#WATCH: Delhi Police baton charges and uses tear gas shells to control the situation at Singhu border where farmers are protesting against #FarmLaws
A group of people claiming to be locals were also protesting at the site demanding that the area be vacated. pic.twitter.com/mF62LNB87j
— ANI (@ANI) January 29, 2021
दरम्यान, यावेळी शेतकरी नेत्यांकडून आंदोलक शेतकऱ्यांना शांती ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.