इस्लामाबाद – पाकिस्तानी तुरूंगांमध्ये सध्या 319 भारतीय कैदेत आहेत. त्यामध्ये 270 मच्छिमार आणि 49 नागरिकांचा समावेश आहे. त्या कैद्यांची यादी पाकिस्तानने शुक्रवारी भारताकडे सादर केली.
भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांत 2008 मध्ये एक करार झाला. त्यानुसार, दोन्ही देश एकमेकांच्या कैदेत असणाऱ्या परस्परांच्या नागरिकांच्या यांद्याची देवाणघेवाण दरवर्षी दोनवेळा करतात. 1 जानेवारी आणि 1 जुलै यांदिवशी ती प्रक्रिया होते.
भारतानेही आपल्या कैदेत असणाऱ्या पाकिस्तानी कैद्यांची यादी त्या देशाकडे सादर केली. भारतातील विविध तुरूंगांमध्ये 340 पाकिस्तानी कैदेत आहेत. त्यातील 263 नागरिक, तर 77 मच्छिमार आहेत.