अनिल विद्याधर
आपत्कालिन स्थितीत डॉक्टरांनी अचानक संप पुकारण्यामागे काय कारण असू शकते, असा प्रश्न सामान्यांना पडू शकतो. यामागे सरकारचे “मिक्सॉपॅथी’ बाबतचे नोटिफिकेशन कारणीभूत आहे. सरकारच्या अधिसूचनेनुसार आयुर्वेद डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए)ने या अधिसूचनेला धोकादायक असल्याचे सांगून ती अधिसूचना परत घेण्याची मागणी केली.
आयुर्वेद किंवा त्यानुसार उपचार करणाऱ्या डॉक्टरांबद्धल संघटनेला कोणताही आक्षेप नाही, मात्र या दोन्ही उपचार पद्धतीला एकसमान लेखून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणे धोकादायक आहे, असे काहींचे म्हणणे आहे. किंबहुना भविष्यात ही आधुनिक उपचार पद्धती आरोग्य शास्त्राला मारक सिद्ध होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली गेली.
आयुर्वेदाच्या बाजूने विचार केल्यास आयुर्वेदशास्त्रात सर्जरी (शल्य चिकित्सा)ला सुश्रुत संहिताला जोडण्यात आले असून शल्य चिकित्सा पद्धती ही आपल्याच प्रवाहातील उपचार पद्धती असल्याचे सांगण्यात येते. परंतु कोणत्याही जुन्या ग्रंथात शस्त्रक्रियेला एखाद्या संस्कृत नावाने ओळखले जात असले तरी शस्त्रक्रियेची आधुनिक उपचार पद्धती ही अन्य कोणत्याही संहितेला जोडण्यास तयार नाही.
शेवटी उपचारपद्धतीच्या या दोन्ही प्रवाहांनी केलेल्या आपापल्या दाव्याचा सन्मान करता येईल. पण अशा प्रकारच्या गोष्टी सामान्य नागरिकांच्या मनात गोंधळ निर्माण करणाऱ्या आहेतच आणि दीर्घकाळाचा विचार केल्यास उपचारपद्धतीबाबत शंकाही उपस्थित केली जाऊ शकते.
बहुतांश रुग्ण हे होमिओपॅथी किंवा आयुर्वेद उपचार पद्धतीकडे आधुनिक उपचार पद्धती म्हणून पाहतात आणि उपचार करतात. वेगवेगळ्या वैशिष्ट्याच्या आधारावर पडताळणी करत कथित मिक्सोपॅथी उपचार पद्धतीची निवड करणे काही वेळा अडचणीचे ठरू शकते.
अर्थात या प्रकरणात आणखी एक बाजू दिसून येते. ही बाजू सार्वजनिक आरोग्याच्या स्थितीचे लक्ष वेधून घेते. शस्त्रक्रिया उपचार पद्धती ही वैशिष्ट्यपूर्ण असूनही भारतीय समुदायातील एक मोठा वर्ग यापासून दूर राहत आहे. अर्थात आर्थिक अडचणींमुळे कमकुवत वर्ग हा अशा प्रकारच्या उपचारापासून वंचित राहत आहे. अशावेळी सर्जरी श्रेणीत काम करणाऱ्या मंडळींनी कमकुवत वर्गांवर अन्याय होणार नाही, यासाठी काम करणे गरजेचे आहे.
महागडी समजली जाणारी सेवा वाजवी दरात कशी उपलब्ध होईल यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. दुसरीकडे नवीन उपचार पद्धती पुढे रेटणाऱ्या डॉक्टर मंडळींनी शरीररचना शास्त्र (ऍनाटॉमी) आणि शरीरक्रियाशास्त्र (फिजिओलॉजी)चे आकलन चांगल्या रितीने करणे गरजेचे आहे. कारण ज्ञानाअभावी रुग्णांचे कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही, याची खबरदारी देखील घेणे तितकेच महत्त्वाचे.