– जयंत माईणकर
इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येईल, अशीही भाकिते व्यक्त केली जात आहेत. असे झल्यास इंडिया आघाडीचे पंतप्रधान कोण होणार? पण जो कुणी होईल तो पुन्हा ‘अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ असणार.
संसदीय शासन पद्धती असलेल्या भारतात अध्यक्षीय राजवटीप्रमाणे एखाद्या नेत्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. एखाद्या नेतृत्वाला पर्यायच नाही किंवा उभा राहिलाच तर तो सध्याच्या नेतृत्वाच्या आसपासही नाही, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. याची सुरुवात पंडित नेहरूंच्या काळातच झाली होती. नेहरूंच्या काळातच ‘Aअषींशी छशर्हीी, ुहे?’ यासारख्या पुस्तकाद्वारे नेहरूंच्या पर्यायाचा शोध घेतला गेला. गमतीची गोष्ट ही की पर्याय म्हणून ज्यांची नावं दिली गेली त्यातील बहुतेक जण या रेसमध्ये मागे पडले. त्यातीलच एक बिजू पटनायक. इंदिरा गांधींनी आपलाच पक्ष फोडून पक्षावरची पकड इतकी घट्ट केली की त्यांच्या देवकांत बरुआ यांच्यासारख्या अनुयायाची मजल तर ‘खपवळीर ळी खपवळर रपव खपवळर ळी खपवळीर’ म्हणेपर्यंत गेली होती.
अर्थात, भाजपही यात मागे नाही. सोनिया गांधी मार्च 1998 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्षा बनल्या आणि त्यांचा राजकारणातील प्रवेश नक्की मानला जाऊ लागला. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांचं नेतृत्व सोनिया गांधी यांच्याहून किती मोठं आहे हे सांगण्यात आघाडीवर होते प्रमोद महाजन. एका बाजूला चाळीस वर्षांपासून संसदेत प्रतिनिधित्व करणारे वाजपेयी, तर दुसर्या बाजूला ग्रामपंचायतीची निवडणूकही न लढलेल्या सोनिया गांधी ही दोघांची तुलना करणारी त्यांची र्िीपलह श्रळपश चांगलीच गाजली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी हे केवळ हिमाचल प्रदेशचे भाजपचे इन्चार्ज होते.
राजीव गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेसने दिलेले दोन्ही पंतप्रधान ’रललळवशपींरश्र िीळाश ाळपळीींशी’ म्हटले पाहिजे. डॉ. मनमोहनसिंग यांनी तर हे सत्य खुलेआम स्वीकारले. नरसिंह राव तर 1991ची निवडणूकही लढवत नव्हते. त्यांनी निवृत्तीची घोषणाही केली होती. पण राजीव गांधी यांच्या हत्येनंतर ते सक्रिय झाले आणि पंतप्रधान बनले. एकूणच एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाला पर्याय नाही, असं जेव्हा सांगितलं जातं त्याच वेळी ’रललळवशपींरश्र’ नेतृत्व तयार होते आणि हे नेतृत्व चर्चेत असलेल्या नावांपैकी नसते.
विरोधकांकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार नसून त्यासाठी भांडणे होतील. दर वर्षाला एक पंतप्रधान पहावा लागेल, हा नेहमीचा आरोप. हा आरोप सर्वप्रथम केला राजीव गांधी यांनी. जनता दल या पक्षाची झगडा दल अशी त्यांनी संभावना केली होती. अर्थात, राजीव गांधींच्या आरोपात तथ्य होतं. कारण त्याआधी जनता पक्षाच्या सुमारे अडीच वर्षाच्या प्रयोगात दोन पंतप्रधान पहावे लागले होते, तर 1989 साली जनता दलाच्या प्रयोगात केवळ 15 महिन्यांत दोन! त्यावेळी भाजप प्रथम जनता पक्षात विलीन झाला होता तर दुसर्या वेळी जनता दलाला बाहेरून पाठिंबा देणारा पक्ष होता. 1996 ते 98 या काळातसुद्धा दोन पंतप्रधान पहावे लागले होते.
पण 2024ची परिस्थिती वेगळी आहे. आज काँग्रेस इतर छोट्या प्रादेशिक पक्षांच्या साह्याने भाजपला चांगलीच टक्कर देत आहे आणि चारसौ पारचे स्वप्न पाहणारा भाजप तिसर्यांदा मोदी पंतप्रधान होणार की नाहीत या चिंतेत आहेत. त्यामुळेच एकेकाळी जो आरोप राजीव गांधींनी जनता दलावर केला होता आज तोच आरोप भाजप काँग्रेसवर करत आहे. पंतप्रधानपदासाठी विरोधकांकडे उमेदवार नाही, ते आपसात भांडत बसतील, हा भाजपचा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील विरोधकांवरचा आरोप. आणि काँग्रेसजवळ नेहरू-गांधी परिवारातील व्यक्तीशिवाय दुसरा कोणीही उमेदवार नाही. अर्थात, त्या आरोपात काही प्रमाणात तथ्य आहे. ममता बॅनर्जी आणि अरविंद केजरीवाल यांनी याआधीच काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सुचवलं आहे. त्यावर अद्याप कोणीही फारसं भाष्य केलेलं नाही.
पस्तीस वर्षे नेहरू-गांधी घराण्याकडे पंतप्रधानपद नाही. भलेही त्यातील पंधरा वर्षे काँग्रेस सत्तेवर असूनही. 2012 साली राहुल गांधीनी पंतप्रधानपद घ्यावं यासाठी प्रयत्न केला गेला होता. पण ते होऊ शकलं नाही. यावेळी मात्र संधी आल्यास पंतप्रधान राहुल गांधीच बनावेत यावर काँग्रेस ठाम आहे. इंडिया आघाडीत भलेही काँग्रेस सर्वात मोठा पक्ष असेल तरीही पक्षाकडे शंभरहून जास्त खासदार नसतील. अशावेळी काँग्रेसवर पुन्हा वंशपरंपरेचा आरोप होऊ शकतो. त्यातच काँग्रेसला मिळणारी अपेक्षित आघाडी दक्षिणेतील राज्यांतून मिळत असल्याने त्या राज्यांकडून तसेच मित्र पक्षांकडून दक्षिणेकडचा पंतप्रधान असावा अशी मागणी आल्यास मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव लेािीेाळीश लरपवळवरींश म्हणून पुढे येऊ शकत. खर्गे हे दलित समाजाचे आहेत.
1972 पासून 2008 पर्यंत कर्नाटक विधानसभेत आमदार असणारे खर्गे यांना 2004 साली काँग्रेसने मुख्यमंत्री पदासाठी डावललं होत आणि धरम सिंग यांचा नंबर लागला होता. त्यानंतर अहमद पटेल यांनी दिलेल्या शब्दाचं पालन करत सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री केलं तर खर्गे केंद्रात रेल्वे मंत्री झाले. त्यांचं खरं भाग्य उजळलं 2014 साली. केवळ 44 खासदार असलेल्या काँग्रेसचे ते नेता बनले. पुढे राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि गेल्या दोन वर्षापासून अध्यक्ष. इंडिया आघाडी जर बहुमताला पोचली आणि दक्षिणेकडचा त्याचबरोबर नेहरू-गांधी घराण्याच्या बाहेरचा पंतप्रधान असावा अशी मागणी झाल्यास 82 वर्षांच्या मल्लिकार्जुन खर्गे यांची लॉटरी लागू शकते.