मुंबई – मराठी रंगभूमीचे, सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते रवी पटवर्धन (actor Ravi Patwardhan passes away) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. वयाच्या ८3 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला म्हणून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले, सुना, मुलगी, जावई, चार नातवंडे असा परिवार आहे. आज सकाळी अकरा वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. निधनाने मराठी सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
रवी पटवर्धन ( Ravi Patwardhan) यांचा जन्म ६ सप्टेंबर १९३७ रोजी झाला. बालगंधर्वांच्या अध्यक्षतेखाली १९४४ साली झालेल्या नाट्यमहोत्सवात वयाच्या साडे सहाव्या वर्षी रवी पटवर्धन ( Ravi Patwardhan) यांनी पहिल्यांदा रंगभूमीवर पदार्पण केले.
रवी पटवर्धन ( Ravi Patwardhan) यांच्या झुपकेदार मिशा आणि जरब बसवणारा आवाज हा त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्वाला अगदी साजेसा होता. आपल्या भारदस्त व्यक्तिमत्वामुळे त्यांनी गावचा पाटील, पोलिस आयुक्त आणि न्यायाधीस अशाबरोबर अनेक खलनायकी भूमिका साकारल्या.
रवी पटवर्धन ( Ravi Patwardhan) यांनी दीडशेहून अधिक नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी २०० हून अधिक चित्रपट केले आहेत. वयाच्या ८२ व्या वर्षीही त्यांनी या नाटकात धृतराष्ट्राचीच भूमिका साकारली. ‘अग्गबाई सासूबाई’ ( Agabai Sasubai TV program ) ही त्यांची शेवटची मालिका ठरली.
रवी पटवर्धन यांचा अभिनय असलेले चित्रपट
अंकुश (हिंदी), अशा असाव्या सुना, उंबरठा, दयानिधी संत भगवान बाबा, ज्योतिबा फुले, झॉंझर (हिंदी), तक्षक (हिंदी), तेजाब (हिंदी), नरसिंह (हिंदी), प्रतिघात (हिंदी), बिनकामाचा नवरा, सिंहासन, हमला (हिंदी), हरी ओम विठ्ठला