सीमा प्रश्नाबाबत तोडगा स्वीकारणार नाही
मुंबई – जनतेला विश्वासात घेतल्याखेरीज महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाबाबत कोणताच तोडगा मी मान्य करणार नाही, असे सुस्पष्ट आश्वासन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी सीमाभागातील शिष्टमंडळाला दिले. हा प्रश्न आता नाजूक अवस्थेत असून तो निश्चितपणे सुटण्याच्या मार्गावर आहे, असे ते म्हणाले.
फराक्का धरण वाद मिटला
डाक्का – फराक्का धरणाबाबत भारत व बांगलादेश यांच्यादरम्यान एक तात्पुरता करार झाला आहे, असे भारताचे कृषिमत्री जगजीवनराम यांनी जाहीर केले आहे. फराक्का धरणाबाबतचा व गंगेचे पाणी उभय देशांत वाटून घेण्याबाबतचा प्रश्न दीर्घ काळ लोंबकळत पडला होता तो आता या कराराने सुटला आहे.
महाराष्ट्र दिनी “विदर्भ बंद’
नवी दिल्ली – विदर्भ हे वेगळे राज्य व्हावे या मागणीसाठी 1 मे रोजी विदर्भात “संपूर्ण बंद’ पाळण्यात येईल, असे महाविदर्भ संघर्ष समितीचे नेते जांबुवंतराव धोटे यांनी जाहीर केले. धोटे पुढे म्हणाले की, या मागणीसाठी 1 मे पासून कायदेभंग चळवळही सुरू करून मागणी मान्य होईपर्यंत ती चालू राहील.
राष्ट्राच्या प्रगतीसाठीउत्पादनवाढ आवश्यक
संगमनेर – महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचे पाणी ठिकठिकाणी अडवून जिरायत जमीन बागायत करायची आहे. कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करण्यासाठी राज्यात कारखानदारी वाढवायची आहे. राष्ट्राची प्रगती व्हायची असेल तर त्यासाठी उत्पादनवाढ आवश्यक आहे, असे उद्गार महाराष्ट्राचे महसूल खात्याचे राज्यमंत्री बी. जे. खताह पाटील यांनी काढले.