लखनऊ : गेल्या 24 तासात उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तब्बल 44 लोकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वृत्तसंस्थेने दिली आहे. पावसामुळे भिंत आणि घर कोसळूण, बुडून मृत्यू, विज पडून तसेच साप चावल्याने हे मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.
जोरदार पावसाच्या पार्श्वभुमीवर लखनऊ, अमेठी आणि हरदोई जिल्ह्यांमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विभागीय आयुक्तांना व जिल्हा दंडाधिकाऱ्यांना सर्व उपाययोजना करण्याचे व बाधित नागरिकांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच संबंधीत आधिकाऱ्यांना पावसाने बाधीत भागांची तपासणी करण्याची आणि या भागांचा दौरा करण्यास सांगितले आहे. यावेळी योगी अदित्यनाथ यांनी मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी आणि जखमींवर तात्काळ उपचारांची व्यवस्था करण्यात यावी.