याला घोटाळा म्हणता येणार नाही
मुंबई – महावितरणचे 22 हजार कोटी हे शेतकऱ्यावर थकीत आहेत, ते कोणी वसूल केलेले नाहीत. त्यामुळे 22 हजार कोटींचा घोटाळा झाला असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया माजी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महावितरणने वीज वापराच्या आकड्यांमध्ये गोलमाल करत गेल्या पाच वर्षात तब्बल 30 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती एमईआरसीच्या अहवालातून समोर आली. यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी हा घोटाळा नसल्याचे स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्यांना वर्षाला तब्बल 33 हजार 856 दशलक्ष युनिट वीज पुरवल्याचे महावितरण सांगत असले तरी प्रत्यक्षात मात्र 22 हजार 856 दशलक्ष युनिट एवढा शेतकऱ्यांचा वीज वापर असल्याचे वीज नियामक आयोगाच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे वाढीव वीज वापर दाखवून महावितरणने शेतकऱ्यांकडून तब्बल 22 हजार कोटी रुपये, तर सरकारकडून सवलतीच्या माध्यमातून आठ हजार 225 कोटी रुपये लाटले आहेत. मात्र, चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, राज्यात 45 लाख शेतकरी आहेत. कोल्हापूर, रत्नागिरी सोडले तर शेतकरी अनमीटर असून हे थकीत बिल असल्याने घोटाळा झाला, असे म्हणता येणार नाही.