नवी दिल्ली – संसदेचे पावसाळी अधिवेशनाच्या 23 दिवसांच्या कालावधीत 17 बैठका पार पडल्या. या अधिवेशनात एकूण 21 विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. अधिवेशनात लोकसभेत सुमारे 44 टक्के आणि राज्यसभेत 63 टक्के कामकाज झाले.
पीआरएस लेजिस्लेटिव्ह रिसर्चने संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, खालच्या सभागृहात 17 बैठका पार पडल्या, ज्या सुमारे 44 तास 15 मिनिटे चालल्या. यात अविश्वास ठरावावरील चर्चा 19 तास 59 मिनिटे चालली. या चर्चेत 60 सदस्यांनी सहभाग घेतला. हा प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आला.
अधिवेशनादरम्यान 21 विधेयके मंजूर करण्यात आली. यात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (सुधारणा) विधेयक, डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण विधेयक, वन (संवर्धन) दुरुस्ती विधेयक आणि खाण आणि खनिजे (विकास आणि नियमन) यांचा समावेश आहे.
या अधिवेशनात मांडण्यात आलेली सुमारे 56 टक्के विधेयके दोन्ही सभागृहांनी मंजूर केली. या अधिवेशनात मांडण्यात आलेले विधेयक सरासरी आठ दिवसांत मंजूर झाले.
.