फारूखाबाद (उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशातील फारूखाबादमध्ये एका गुन्हेगाराने ओलीस ठेवलेल्या २० मुलांची अखेर ८ तासानंतर सुखरूप सुटका करण्यात आली आहे. तर आरोपीचा खात्मा करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
UP Additional Chief Secretary and Principal Secretary Home Awanish Kumar Awasthi on children kept as hostage at a house in Farrukhabad: The person who was holding the children as hostage has been killed in an operation and all children have been safely evacuated. pic.twitter.com/48QYcsoGRr
— ANI UP (@ANINewsUP) January 30, 2020
सुभाष बाथम असे या गुन्हेगाराचे नाव आहे. मात्र, मुलांना ओलीस ठेवण्यामागचे कारण समजू शकले नाही. दोन वर्षांपूर्वी सुभाषने आपल्या एका नातेवाईकाचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो तुरुंगातही गेला. एक वर्षापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली. त्याला एक 10 वर्षाची मुलगी आहे. गुरुवारी मुलीच्या वाढदिवसानिमित्त गावातील लहान मुलांना त्याने आपल्या घरी बोलावले होते. ही सर्व मुले 5 ते 7 वर्षांची आहेत. सगळी मुले दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याच्या घरी दाखल झाली. त्यानंतर आरोपी सुभाषने घराचा दरवाजा बंद केला. सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास एक महिला आपल्या मुलाला घेण्यासाठी त्याच्या घरी गेली. तेव्हा मुलांना ओलीस ठेवण्यात आल्याचे तिला कळाले. तिने तातडीने पोलिसांना याबाबतची माहिती दिली. घटनेची माहिती कळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
आरोपीने पोलिसांना घराबाहेर एक चिठ्ठी फेकून आपली मागणी सांगितली. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शौचालय आणि घर बांधून न दिल्यानं त्यांने तीव्र नाराजी व्यक्त केली. या योजनांचा लाभ न मिळाल्याबद्दल त्याने सचिव आणि डीएम यासाठी जबाबदार असल्याचा त्याने आरोप केला होता.
पोलिसांनी आवाहन केल्यानंतरदेखील सुभाषने कोणताच सकारात्मक प्रतिसाद दिला नाही. मात्र, त्याने पोलिसांवर देशी बनावटीच्या पिस्तूलने गोळीबार सुरू केला. त्याशिवाय त्याने बॉम्बफेक देखील केली. या बॉम्बफेकीत घराजवळील एक भिंत ढासळली.