जयपूर –राजस्थान विधानसभा निवडणुकीत एकूण 1 हजार 875 उमेदवार नशीब आजमावणार आहेत. त्यामध्ये 183 महिलांचा समावेश आहे. विधानसभेच्या एकूण 200 जागा असणाऱ्या राजस्थानात 25 नोव्हेंबरला मतदान होईल. त्या निवडणुकीसाठी तब्बल 2 हजार 605 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील 240 उमेदवारांचे अर्ज छाननीवेळी बाद करण्यात आले. तर, 490 उमेदवारांनी माघार घेतली.
माघार घेणाऱ्यांमध्ये काही बंडखोर उमेदवारांचाही समावेश आहे. त्यामुळे कॉंग्रेस आणि भाजप या प्रमुख राजकीय प्रतिस्पर्ध्यांना बऱ्याच प्रमाणात दिलासा मिळाला. राजस्थानच्या सत्तेसाठी त्या पक्षांमध्येच पुन्हा मुख्य लढत होणार आहे. सत्ता राखण्यासाठी कॉंग्रेसने, तर सत्ता परिवर्तन घडवण्यासाठी भाजपने सर्व ताकद पणाला लावली आहे.