नगर -आपल्या पुढच्या पिढीसाठी पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी वृक्षलागवडीच्या मोहिमेत प्रत्येकाने आपले दायित्व द्यावे, असे आवाहन स्नेहबंध चे अध्यक्ष उद्धव शिंदे यांनी केले.
स्नेहबंध सोशल फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी (दि.9) अहमदनगर गॅरीसन इंजिनियर (नॉर्थ) कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कार्यकारी अभियंता जनकराज मित्तल, अभियंता हरिंदरपाल सिंग, एस. व्ही. निकम, पी.एस. शितोळे, अमरजीत डोग्रा, हेमंत ढाकेफळकर आदी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, सध्या निसर्ग संतुलन बिघडले आहे. त्यासाठी पर्यावरण ऱ्हास टाळलाच पाहिजे. पुढच्या पिढीसाठी झाडे लावली पाहिजेत. यातून दुष्काळावर मात करता येईल. आता जागे होण्याची वेळ आहे. धरती वाचवण्यासाठी प्रदूषण पातळी खाली आणली पाहिजे. यासाठी कार्बन उत्सर्जन कमी केले पाहिजे. पुढच्या पिढीच्या संवर्धनासाठी आता झाडे लावूया, असे आवाहन त्यांनी केले.