– सूर्यकांत पाठक
अन्नाच्या नासाडीसंदर्भात अलीकडेच संयुक्त राष्ट्र संघटनेने अहवाल जारी केला आहे. त्यानुसार जगभरात दररोज जवळपास एक अब्ज ताटांइतके अन्न वाया जाते, असे दिसून आले आहे. म्हणजेच प्रत्येक व्यक्ती दरवर्षी सरासरी 79 किलो अन्न वाया घालवते, असे हा अहवाल दर्शवतो. अर्थात, ही आकडेवारी अत्यंत चिंताजनक आहे. तसेच जगभरातील एकूण उत्पादनाच्या 30 टक्के खाद्यान्न वाया जात असल्याचे या अहवालातून समोर आले आहे. एकट्या अमेरिकेत वाया जाणार्या अन्नाचे प्रमाण हे सहारा वाळवंटाच्या दक्षिणेस असलेल्या आङ्ग्रिकी देशांची गरज भागवणारे आहे.
त्याचवेळी इटलीत वाया जाणारे अन्न हे इथोपियाची भूक भागवणारे आहेे. अन्नाची ही नासाडी एकूण ग्रीनहाउस गॅस उत्सर्जनात एक तृतीयांश योगदान देते. या अहवालात वाया जाणार्या अन्नांमुळे उत्सर्जित होणार्या ग्रीन हाउस गॅसच्या हवामान बदलावर, पर्यावरणावर आणि पोषणावर होणार्या परिणामांची चर्चा केली आहे. ही महत्त्वाची बाजू आहे. कारण, अन्नसुरक्षेबरोबरच पर्यावरण वाचविण्याचा मुद्दा देखील यात मांडला आहे.
अन्ननासाडीच्या मुद्द्याचे गांभीर्य समजून घेण्यापूर्वी आपल्याला जगभरातील खाद्यपदार्थांच्या उपलब्धतेबाबत जाणून घेणे गरजेचे आहे. जगाची लोकसंख्या सध्या सुमारे 7.8 अब्ज आहे आणि ती 2050 पर्यंत नऊ अब्जांपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. जगभरात अन्नाधान्याचे उत्पादन पाहता ते 14 अब्ज लोकांसाठी पुरेसे आहे. याचाच अर्थ आपण गरजेपेक्षा दुप्पट उत्पादन घेत आहोत. समाजातील एका घटकासाठी त्याचे प्रमाण गरजेपेक्षा अधिक आहे, तर त्याचवेळी दुसरा वर्ग अन्नधान्याच्या टंचाईचा सामना करत आहे. एकीकडे 30 टक्के मुले लठ्ठपणाचा सामना करत आहेत, तर दुसरीकडे जगभरातील 12 टक्के लोकसंख्येकडे पुरेसे भोजन नाही. अर्थातच ही विसंगती असून जगभरातील धोरणकर्त्यांसाठी ती गंभीर बाब म्हणून आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे.
ज्येष्ठ कृषीअभ्यासक देविंदर शर्मा यांच्या मते, आपण या समस्येवर दोन मार्गाने तोडगा काढू शकतो. पहिले म्हणजे जगातील ढासळते पर्यावरण पाहता आपण धान्योत्पादनावर कमी भर द्यायला हवा आणि दुसरीकडे अन्नाची नासाडी रोखायला हवी. यानुसार आपण जगाची गरज तत्काळ भागवू शकतो. तसेच यामुळे अन्न वाया जाण्याचे प्रमाण कमी राहील आणि गरजेपेक्षा अधिक धान्योत्पादन करण्याची आवश्यकताही राहणार नाही. हरित क्रांतीप्रमाणेच ही एक क्रांती करण्याची गरज आहे. ही क्रांती झाल्यास पृथ्वी, पर्यावरण, नैसर्गिक स्रोत, जैवविविधता, वन जमीन या सर्व घटकांना होणारे नुकसान कमी राहू शकते. या कामात सर्व देशांना सामावून घ्यावे लागेल. विशेषत: विकसनशील देशांना. कारण तेथे अधिक झळ बसत आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालानुसार, अन्नाच्या एकूण नासाडीपैकी 60 टक्के भोजन हे घरगुती पातळीवरच वाया जाते आणि 13 टक्के पुरवठा साखळीत खराब होते. सर्वात कमी रिटेल म्हणजेच दुकानात नुकसान होते. ग्रामीण भागात भोजनाची सर्वात कमी नासाडी होते, असे म्हटले आहे. यामागचे कारण म्हणजे मनुष्यप्राण्याबरोबरच प्राणीमात्राचाही विचार केला आहे. वास्तविक आपण जेव्हा अन्नसुरक्षेचा विचार करतो तेव्हा त्यात मनुष्याबरोबरच प्राण्यांचाही समावेश होतो. गावात मनुष्याबरोबर, श्वान, पक्षी आदींची देखील अन्नसुरक्षा पाहतो. त्यामुळे अन्नपदार्थ शिल्लक राहिला तरी तो वाया जाऊ दिला जात नाही. गावातील कुत्रे, शेळ्या, गायी-म्हशी यांना दिला जातो.
खराब झालेल्या अन्नाचे कंपोस्ट केले जाते. म्हणून अन्नाची नासाडी टाळण्यासाठी ग्रामीण भागाकडून शिकायला हवे. शहरांमध्ये बहुतांश फ्लॅटमध्ये-घरांमध्ये राहिलेले अन्न एक तर बेसिनमध्ये टाकून पाण्याद्वारे ड्रेनेजमध्ये ढकलले जाते किंवा डस्टबीन बॅगमध्ये भरून कचर्यात टाकले जाते. पशुपक्ष्यांना अन्न देण्याचा विचार शहरात ङ्गारसा दिसतही नाही आणि तशा सुविधाही ङ्गारशा नाहीत. अलीकडील काळामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाऊ लागल्याने वाया जाणार्या अन्नापासून कंपोस्ट खत करण्याचे प्रमाण वाढले आहे, ही त्यातल्या त्यात सुदैवाची बाब म्हणायला हवी.
कृषीसंस्कृती अद्यापही कायम असणार्या गावाखेड्यांमध्ये मनुष्य आणि प्राणी यांचे घनिष्ठ नाते असते. शहरात तसे बंध पाहायला मिळत नाहीत. शहरांमधील अन्ननासाडीमध्ये हॉटेल आणि समारंभांमध्ये होणारी नासाडी अधिक दिसून येते. आपण सहज जरी एखाद्या हॉटेलमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये नजर टाकल्यास उच्चशिक्षित, उच्चभ्रू म्हणवले जाणारे आणि आलिशान गाड्यांमधून आलेले लोक हॉटेलमध्ये ऑर्डर केलेल्या डिशमध्ये सर्रास अन्नपदार्थ सोडून जाताना दिसतात. त्याचे जराही वैषम्य त्यांना वाटत नाही. बहुतांश हॉटेलचालक उरलेले अन्न पार्सल म्हणून घरी देण्यास तयार असतात; पण तथाकथित उच्चभू्रंना त्यात कमीपणा वाटतो.
हाच सुशिक्षित, सधन वर्ग आलिशान पार्ट्यांमध्ये, लग्नसमारंभांमध्ये गेल्यानंतर बुङ्गे सिस्टीममध्ये आपल्या हाताने स्वादिष्ट व्यंजने भरमसाठ प्रमाणात ताटात वाढून घेतो आणि बिनधास्तपणाने त्यातील बरेचसे अन्न ताटामध्ये ठेवून ती डिश प्लेटबॉक्समध्ये टाकून निघून जातो. या वर्गाला अन्नाची किंमत काय असते हे कोण समजावणार? जेवणाचे ताट चाटूनपुसून स्वच्छ करण्याचा संस्कार या वर्गात ‘बॅड मॅनर्स’खाली गणला जातो.
विशेष म्हणजे हाच वर्ग गरीब लोक अन्न वाया घालवतात, असा आरोप करताना दिसतो. वास्तविक गरीब, ग्रामीण भागातील नागरिकांना खूप कष्टाने दोन वेळचे अन्न मिळते. त्यामुळे ते अन्न वाचविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात. या अहवालात जी-20 देश (ऑस्ट्रेलिया, जपान, ब्रिटन, अमेरिका) आणि युरोपीय संघ यांनी अन्नाची नासाडी रोखण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नाचा उल्लेख आहे. कॅनडा आणि सौदीने देखील चांगले यश मिळवले आहे. अन्य देशांनी देखील यादृष्टीने प्रयत्न करायला हवेत.
शहरात अन्नाची नासाडी थांबविण्यासाठी जागरुकता वाढविणे गरजेचे असून त्याकडे लक्ष द्यायला हवे. यात माध्यमांची आणि सेलिब्रिटीज प्रामुख्याने नायक-नायिका, क्रिकेटपटू यांची भूमिका मोलाची आहे. भोजन वाया जाऊ नये यासाठी त्यांनी समाजात जागरुकता आणायला हवी. सरकारचा विचार केला तर त्यांच्या धोरणात ङ्गूड वेस्टेज रोखण्याचा मुद्दा नेहमीच मांडला जातो. परंतु दुसर्या प्रकारच्या वेस्टेजवर देखील लक्ष दिले पाहिजे. लुधियाना येथील आयसीएमआरची संस्था सीङ्गेट (सीआयपीएचईटी)ने भारतातील अन्ननासाडीबाबत केलेल्या अभ्यासात म्हटले, अन्नधान्याच्या साठवणुकीत सर्वात कमी नुकसान गहू आणि तांदळाचे होते. सर्वाधिक नासाडी ङ्गळ आणि भाजीपाल्यांची होते. यात काही ङ्गळे जसे पेरूचे सर्वाधिक नुकसान होते. टोमॅटो देखील खूप वाया जातो.
अन्नपदार्थांची नासाडी ही दोन मार्गाने होते. एक म्हणजे ताटात टाकून दिले जाणारे अन्नपदार्थ आणि दुसरे म्हणजे पुरवठा साखळीत होणारी नासाडी. ते रोखण्यासाठी देखील प्रयत्न हवेत. तिसरी गोष्ट म्हणजे प्रक्रियेच्या काळात पदार्थ वाया जात असल्याने शिल्लक राहण्याचे प्रमाणही वाढते. ज्या पॅकेटमध्ये हे पदार्थ सीलबंद करून विक्रीसाठी ठेवले जातात, ते देखील कालांतराने वाया जातात आणि दुर्दैवाने याकडे लक्ष दिले जात नाही. या गोष्टी रोखण्यासाठी आतापर्यंत कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत. संयुक्त राष्ट्र अन्ननासाडीबाबत अगदी वेळेवर इशारा देत आले आहे. त्याकडे आपण गांभीर्याने पाहणार कधी? प्रामुख्याने पोषण आहार, अन्न सुरक्षा आणि हवामान बदल यावरून धोरणात्मक बदल करायला हवेत. आपल्याला अन्नधान्योत्पादन वाढविण्यावर भर देण्याऐवजी जेवढे उत्पादन घेत आहोत, त्याचा योग्य वापर केला आणि अन्ननासाडी टाळली तरी दुसर्या हरित क्रांतीची गरज भासणार नाही.