नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळाने रेल्वे मंडळाच्या पुनर्रचनेला मान्यता दिली. रेल्वे मंडळांची संख्या त्यांच्या अध्यक्षांसह आठवरून पाचवर आणण्यात येणार आहे. त्याच्या अनेक भगांचे एका रेल्वे व्यवस्थापन समितीत विलीनीकरण करण्यात येणार आहे.
वाहतूक, रेल्वेचे चालू डब्बे आणि इंजिन, संकर्षण आणि आभियांत्रिकी विभागाच्या रेल्वे मंडळांच्या सदस्यांऐवजी संचलन, व्यवसाय विकास, मनुष्यबळ विकास, मुलभूत संरचना आणि वित्त या क्षेत्रातील सदस्य नेमण्यात आले. भारतीय रेल्वेत आता एकच विभाग असेल. भारतीय रेल्वे सेवा या खालीच सध्याच्या अभियांत्रिकी, वाहतूक आदी आठ विभागाचे विलीनीकरण करण्यात येणार आहे.