मंचर – देशभरात करोना बाधित रुग्ण मोठ्या संख्येने आढळत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आंबेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या अंतर्गत राहणाऱ्या 50 हजार कुटुंबीयांचा सुमारे दिड हजार शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने सोमवारी (दि. 6) सर्वे करण्यात आला. अशी माहिती गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय स्तरावरून देशांतर्गत विमान प्रवास करून आलेले प्रवासी, परराज्यातून आलेले प्रवासी, तसेच पुणे, मुंबई व राज्यातील इतर जिल्ह्यांमधून काही नागरिक प्रवास करुन आंबेगाव तालुक्यात आले आहेत. काही ग्रामस्थ परतण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे करोनाविषयीचा संसर्ग आंबेगाव तालुक्यात होण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर नियंत्रण करणे व करोनाविषयी सर्व खबरदारी घेणे क्रमप्राप्त आहे. करोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू नये. यासाठी उपाययोजना आखल्या आहे. यापूर्वीच एक ते चार टप्प्याचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील सर्व कुटुंबांचे पुन्हा सर्वेक्षण करुन बाधित किंवा करोना विषाणूचा प्रसार होणार नाही. यासाठी गृहभेटीद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. अ
तहसीलदार रमा जोशी म्हणाल्या, ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात ग्रामसेवक, माध्यमिक, प्राथमिक शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षिका, तलाठी, कोतवाल, पोलीस पाटील, कृषिसेवक, कृषी पर्यवेक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून ग्रामसेवक व सरपंच यांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भागांचे विभाजन करून सर्व पदाधिकाऱ्यांनी दिवसभर सर्वे करून ताप, खोकला, सर्दी असणारे, आजारी, बाहेरून आलेले नागरिक त्यांची माहिती जमा करुन ग्रामपंचायत मध्ये देण्यात आली आहे.
निरगुडसर ःयेथे गृहभेटीद्वारे सर्वे करताना शासकीय कर्मचारी.