नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत भाजपच्या लाटेमुळे काँग्रेसचे अक्षरश: पानिपत झाले आहे. निवडणुकीतील प्रभावाची जबादारी स्वीकारून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस कार्यकारणी समितीच्या बैठकीत आपला राजीनामा सादर केला होता. परंतु, हा राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळला असल्याचे काँग्रेसने सांगितले आहे. जरी राहुल गांधींच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असला तरीही राहुल गांधींनी राजीनामा द्यावा, अशी इच्छा त्यांची बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस ‘प्रियंका गांधी’ यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. “भावानं घेतलेल्या निर्णयामागील नेमकं कारण मला माहिती आहे”. असं प्रियांका गांधींनी म्हंटल आहे.
लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी काँग्रेसला केवळ ५२ जागा मिळाल्या आहेत. राहुल गांधी यांनी वायनाडमधून विजय मिळवला असला तरीही परंपरागत अमेठी मतदारसंघ त्यांना राखता आला नाही. तर १९ राज्यांमध्ये काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.