बॉलीवूडमध्ये एकापाठोपाठ एक हिट चित्रपट दिलेला अभिनेता कार्तिक आर्यन सध्या चित्रपट निर्मात्यांचा आवडता अभिनेता बनला आहे. तसेच काही दिवसांमध्ये त्याच्या चाहत्यांच्या संख्येतही खूप वाढ झाली आहे. सध्या कार्तिक आर्यन हा इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात सारा अली खानसोबत काम करत आहे. आता त्याला आणखी एक बिग बजेट असलेला चित्रपट हाती आला आहे.
2007साली प्रदर्शित झालेला अक्षय कुमारच्या “भूल भुलैया’ या सुपरहिट चित्रपटाच्य सीक्वलसाठी कार्तिकचे नाव आघाडीवर आहे. या चित्रपटाचा सीक्वल काढणार असल्याची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली असून त्याची स्क्रिप्ट फरहद सामजी लिहित आहेत.
कार्तिक आर्यनने चित्रपट निर्मात्यांची काही दिवसांपूर्वीच भेट घेतली आहे. तसेच या सिक्वलमध्ये अक्षय कुमार काम करणार नसल्याचेही समजते. त्यामुळे अक्षयच्या अनुपस्थितीत कार्तिकचा जादू चालतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. दरम्यान, मुख्य भूमिकेसाठी विकी कौशल, आयुष्मानप खुराना आणि राजकुमार राव यांची नावे शॉर्ट लिस्टमध्ये निवडण्यात आली आहेत. आता यापैकी “भुल भूलैया’च्या सिक्वलमध्ये कोणत्या अभिनेत्याची निवड होते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.