पुणे – नैर्ऋत्य मोसमी वाऱ्याचा प्रवाह क्षीण झाला असतानाच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनच्या आगमनाला जोर मिळाला असून गुरुवारपर्यंत (दि.13) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, विदर्भ आणि मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये मात्र मान्सून लांबणार असल्याची चिन्हे दिसत आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे वादळात रुपांतर होण्याचे संकेत आहेत. या प्रभावामुळे मान्सून वेगाने पुढे सरकेल. दक्षिण महाराष्ट्राला धडक दिल्यानंतर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात मान्सूनची प्रगती होईल, मात्र कमी दाब प्रणाली उत्तरेकडे सरकल्यानंतर मान्सूनचा प्रवाह कमजोर होणार आहे. त्यामुळे राज्यातील उर्वरित भागातील वाटचाल मंदावणार आहे.