सासवड – समाजामध्ये समतेची बीज रुजविणाऱ्या वारीमध्ये धर्म, जात, वर्ण अशा कोणत्याही गोष्टींना थारा नाही. विठ्ठलाच्या भक्तीमध्ये लीन झालेले हे वैष्णव केवळ पंढरीच्या भेटीचा आस मनामध्ये घेऊन चालत राहतात. अशाच या समतेच्या वारीमध्ये बंजारा समाजाच्या महिलांनी विठ्ठलाच्या भक्तीत लीन होऊन भजन सादर केले आहे.