कोल्हापूर – आदिशक्ती आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख पीठ असलेल्या कोल्हापूरच्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा शारदीय नवरात्रौत्सव प्रसिद्ध आहे. या कालावधीत देशभरातून 15 लाखांहून अधिक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. महापुरच्या फाटक्या नंतरही यंदाचा नवरात्रौत्सव मोठ्या जल्लोषात आणि नावीन्यपूर्ण उपक्रमांनी साजरा करण्यास सुरुवात झाली आहे.
कोल्हापूरचे अंबाबाईचे देऊळ हे पुराणात उल्लेखलेल्या 108 पीठांपैकी एक, आणि महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. मंदिराच्या मांडणीवरून ते चालुक्यांच्या काळात इ.स. 600 ते 700 मध्ये बांधले असण्याची शक्यता आहे.
मंदिराचे पहिले बांधकाम राष्ट्रकूट किंवा त्या आधीचा शिलाहार राजांनी सुमारे आठव्या शतकात केले असावे. पुराणे, अनेक जैन ग्रंथ, ताम्रपत्रे आणि सापडलेली अनेक कागदपत्रे यांवरून अंबाबाई मंदिराचे पुरातनत्व सिद्ध होते आणि कोल्हापूरची अंबाबाई खर्या अर्थाने अखिल महाराष्ट्राची कुलस्वामिनी ठरते..कधी काळी मोगलांनी या देवळाचा विध्वंस केला तेव्हा देवीची मूर्ती पुजार्याने अनेक वर्षे लपवून ठेवली होती, असे म्हणतात. पुढे संभाजी महाराज यांच्या कारकीर्दीत इ.स. 1715 ते 1722 या कालखंडात मंदिराचे पुनरुज्जीवन करण्यात आले. उत्तम कोरीव काम असलेल्या भिंती आणि अगदी साधे वरचे शिखर हा कारागिरीतला फरक त्यामुळेच पडला असावा.
मांगल्य आणि आदिशक्तीचा उत्सव असलेल्या नवरात्रोत्सवाला रविवारी घटस्थापनेने सुरूवात होत आहे. करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्यावतीने नवरात्रोत्सानिमित्त आयोजित केलेल्या विविध धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचाही घट बसला. देवस्थान समितीच्यावतीने मंदिरात घटस्थापना करण्यात येते. यावेळी तोफेची सलामी देण्याची परंपरा आजही आहे.
आदिशक्ती आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे. या कालावधीत देशभरातून 25 लाखांहून अधिक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येतात. पर्यटनवृद्धी आणि भाविकांना सोयीसुविधा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून यंदाच्या नवरात्रोत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचाच भाग म्हणून भवानी मंडप परिसरातही विद्युत रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येतंय. यातच नवरात्रात 9 दिवस देवीची विविध रूपात आकर्षक पूजा बांधण्यात येते .
सुरक्षेच्या कारणात्सव अंबाबाई मंदिरात नवरात्र काळात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवली आहे. मेटल डिटेक्टर दरवाजातून येणाऱ्या प्रत्येक भाविकाची तपासणी केली जाणार असून मोठ्या बॅगसह प्रवेश देण्यात येत नाही. गेल्या वर्षीपासून नवरात्रकाळात अंबाबाई मंदिरात प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी करण्यात आली आहे. भाविकांनी स्वत:च्या कापडी पिशव्या आणाव्यात आणि दुकानदारांनी पिशव्या विक्री करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
अं
बाबाई मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.राज्यभरातून लाखो पर्यटक इथं देवीच्या दर्शनासाठी दाखल होतात. ते देखील देवीचं रूप पाहून समाधान व्यक्त करतात यावर्षी पासून दसऱ्या दिवशी अंबाबाईला देवनार शालू पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तिरुपती देवस्थान समिती कडून शालू मागवणार नाहीत . त्यामुळं स्वतःचा शाहू देवस्थान समिती अंबाबाईला नेसवणार आहे. त्यामुळं आपण देखील कोल्हापूरच्या अंबाबाईच्या दर्शनाला नक्की या…