हैदराबाद: हैदराबादमधील “गरबा आणि दांडिया’ कार्यक्रमाच्या आयोजकांना नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमात भाग घेणाऱ्या गैर-हिंदूंचा प्रवेश तपासण्यासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यास बजरंग दलांने शनिवारी सांगितले. आयोजकांना
गेल्या काही वर्षात गैर-हिंदू तरुण अशा कार्यक्रमांत प्रवेश करून महिलासोबत गैरवर्तन करीत होते, असा दावा उद्देशून प्रसिद्ध केलेल्या खुल्या पत्रात करण्यात आला आहे. असे तरुण तरुणींच्या बचावासाठी येणाऱ्या पुरुषांनाही धक्काबुक्की करतात, असा दावा पत्रात केला आहे.
तसेच, या घटनांनी निर्दोष मुलींना सापळा रचण्यासाठी या घटनांचा वापर केला जातो. त्यामुळे लव्ह-जिहादचे प्रकरण घडते, असा आरोपही केला गेला आहे. त्यामुळे गरबा आयोजकांनी बिगर-हिंदू सुरक्षा रक्षकांनाही नोकरी देण्यास टाळावे, असे त्यात म्हटले आहे. बजरंग दलाचे कार्यकर्त्यांचे पथक गरबा-दांडियाच्या स्थळांवर हजर असतील आणि अशा प्रकारची घटना घडल्यास त्या घटनांमध्ये घुसखोरी रोखण्यासाठी त्वरित कारवाई केली जाईल, असे पत्रात म्हटले आहे.