पुणे – देशातील मॉब लींचिंगच्या वाढत्या घटनांविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी आज जाहिरपणे संताप व्यक्त केला आहे. ते आज पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते.
त्यावेळी ते म्हणाले की गेल्या ६ वर्षांपासून आपण देशात काय पाहतोय ? पुण्यात 2014 मध्ये मोहसिन शेख या तरूणाची हत्या करण्यात आली होती, त्या घटनेनंतर या मॉब लींचिंगच्या घटनांमध्ये वाढ होत गेली. त्यानंतर मोहम्मद अखलकलाही मारण्यात आले, त्याच्याकडे बीफ होत असा आरोप करण्यात आला होता, मात्र त्यानंतर त्याच्याकडे बीफ नव्हतच, अशी माहिती समोर आली. जर त्याच्याकडे बीफ असत तरी त्याला मारण्याचा अधिकार या लोकांना कुणी दिला?
Shashi Tharoor, Congress: What have we seen in last 6 years?It started with the killing of Mohsin Shaikh in Pune. Then,Mohd Akhlaq was killed saying he is carrying beef. But it was reported later that it was not beef.Even if it was beef,who gave anyone the right to kill a person? pic.twitter.com/p9NwVgPUZR
— ANI (@ANI) September 22, 2019
त्यानंतर ते म्हणाले की पहलू खान यांच्याकडे गायीला घेऊन जाण्याचे लायसेन्स होते, मात्र तरीही जमावाने त्यांना ठार केले. मात्र एका निवडणुकीच्या विजयाने या लोकांना एवढी ताकद मिळाली की ते काहीही करू शकतात आणि कुणालाही ठार मारू शकतात.
Congress leader Shashi Tharoor in Pune: Also, Pehlu Khan had the licence to carry cow in lorry for dairy farming, but he was also lynched to death. One election result gave so much power to such people that they do anything and kill anyone? #Maharashtra https://t.co/TRaVUMC3rV
— ANI (@ANI) September 22, 2019
ते पुढे असेही म्हणाले की हाच आपला भारत आहे का ? आणि ही हिंदू धर्माची शिकवण आहे का ? मी हिंदू आहे मात्र अशा प्रकारचा हिंदू नाही. लोकांना जय श्री राम म्हणण्यावरून मारले जाते, आणि असे करणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे, आणि हा भगवान श्रीराम यांचाही अपमान आहे, कारण त्यांच्या नावाचा वापर करून लोकांना मारले जात आहे, अशी टीका त्यांनी सरकारवर केली आहे, आणि मॉब लींचिंग विरोधात संताप व्यक्त केला आहे.
Shashi Tharoor: Is this our Bharat? Is this what Hindu Dharam says? I am a Hindu but not of this kind. Also, while killing people, they are asked to say ‘Jai Sri Ram’. It is an insult to Hindu Dharma. It is an insult to Lord Ram that people are being killed using his name. pic.twitter.com/30FyKel2aO
— ANI (@ANI) September 22, 2019
ते म्हणाले की आता भारत हा असा देश झाला आहे की तिथे सहिष्णुतेला काही जागा राहिलेली नाही. भारतात राजकीय ध्रुवीकरण झाले आहे आणि याला सत्ताधारी पक्ष आणि त्यांची ही कृत्ये जबाबदार असल्याची आगपाखड त्यांनी केली आहे.