Young Girl Farmer । आज देशात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करतायेत. मग ते शिक्षण क्षेत्र असो वा शेती. शेती तर भारताचा पारंपरिक व्यवसाय आहे. याच व्यवसायाला आधुनिकते जोड देऊन यशस्वी करून दाखवण्याचे काम उत्तर प्रदेशातील एक २३ वर्षीय तरुणीने केलंय. पारंपरिक पिकासोबत भाजीपाल्याच्या शेतीतून लाखो रुपये कमावणाऱ्या तरुणीने सर्वांसमोर एक नवा आदर्श उभा केलाय. आजच्या Success Story च्या भागात आज आपण अनुष्का जयस्वाल या तरुण महिला शेतकरीविषयी आणि तिच्या नवनवीन प्रयोगाविषयी जाणून घेऊ…
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ येथील अनुष्का जयस्वाल या तरुण महिला शेतकऱ्याने अभ्यासानंतर एखाद्या कंपनीत नोकरी करण्या ऐवजी काही तरी वेगळं करण्याचा निश्चय केला. त्यातही आपल्या परंपरेला जोपासण्यासाठी काही तरी करायचे म्हणून तिने शेतीचा मार्ग निवडला. तिचा निर्णय योग्य होता हे तिच्या आजच्या दरमहा 2 लाख रुपयांहून अधिक कमावण्याने सिद्ध झाले. एवढंच नाही तर तर 20 हून अधिक लोकांना तिने रोजगार उपलब्ध करून दिलाय. वयाच्या 23 व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली आणि आता ती 27 वर्षांची आहे. आज ती वार्षिक ४५ लाख रुपयांपेक्षा जास्त नफा कमावत आहे.
वयाच्या २३ व्या वर्षी शेती करायला सुरुवात केली Young Girl Farmer ।
एका इंग्रजी वृत्तवाहिनीसोबत बोलताना अनुष्काने तिच्या शेतीच्या प्रवासाविषयी माहिती दिलीय.अनुष्काने सांगितले की, 2021 मध्ये तिने लखनऊच्या मोहनलालगंज भागात असलेल्या सिसेंडी गावात एक एकर जमीन भाडेतत्वावर घेऊन शेतीची सुरुवात केली. त्यावेळी ती 23 वर्षांची होती. दिल्लीच्या हिंदू कॉलेजमधून अर्थशास्त्राचे तिने शिक्षण घेतले. तिला या क्षेत्रात नोकरी करायची नव्हती म्हणून तिने काहीतरी वेगळं करायचं ठरवलं.
भाऊ पायलट, बहीण वकील आणि वहिनी सॉफ्टवेअर
दिल्ली युनिव्हर्सिटीतून उत्तीर्ण झालेल्या अनुष्का जयस्वालच्या शेतात पिकवलेल्या भाज्या लखनऊच्या सर्व मार्केट आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये विकल्या जात आहेत. त्यामुळे सातत्याने नफा मिळतोय. अनुष्काच्या कौटुंबिक पार्श्वभूमीविषयी बोलायचे झाल्यास वडील व्यापारी आहेत आणि आई गृहिणी आहे. तर भाऊ पायलट आहे, बहीण वकील आहे. वहिनी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. कुटुंबाची पार्श्वभूमी शेतीची नसल्याने त्यांच्याकडे वडिलोपार्जित काहीही नव्हते. अशा परिस्थितीत प्रथम एक एकर जमीन भाडेतत्त्वावर घेण्यात आली. नंतर तीन एकर घेतले. त्यानंतर प्रशिक्षण घेऊन शेती करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणही दिले. जास्तीत जास्त तंत्रज्ञान वापरले.
शेतीसाठी सरकारकडून ५० टक्के अनुदान मिळाले आणि एक एकरावर तिने सुरुवातीला पॉली हाऊस सुरू केले. हळूहळू यात भर पडत गेली आणि आता ती आणखी 6 एकरवर शेती करत आहे, ज्याठिकाणी सिमला मिरची, कोबी, फ्लॉवर आणि इतर अनेक भाज्या आहेत. यातून त्यांना भरपूर नफाही मिळत आहे.
यशस्वी महिला शेतकरी अनुष्का जयस्वालने आपल्या निर्णयानुसार हे शेत निवडले तेव्हा काही लोकांनी तिचे खच्चीकरण करत यात काहीही नफा होणार नाही. तोट्याचा सौदा आहे असे म्हटले. येवढें नाही तर एक मुलगी शेती कशी करणार? असा सवाल लोक करत होते. पॉली हाऊस सूर्यप्रकाशात कसे कार्य करेल? ती कामगारांशी कशी वागेल? लोकांनी सर्व प्रकारच्या गोष्टी रंगवल्या. उलट लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अनुष्काला अवघ्या 4 वर्षात मेहनतीचे फळ मिळाले. या चार वर्षात तिला 45 लाखांहून अधिक नफा मिळत आहे.
सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड Young Girl Farmer ।
जास्तीत जास्त तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे कमी जमिनीतही अधिक उत्पादन कसे करता येईल हे अनुष्काला समजले. त्यानुसार त्यांच्या एका एकरात 50 टन इंग्रजी काकडीचे उत्पादन झाले. तर लाल पिवळी भोपळी मिरचीचे पीक ३५ टन होते. एवढेच नाही तर बाजारात सिमला मिरचीचा भावही चांगलाच मिळत आहे. लखनौच्या सर्व बाजारपेठांमध्ये आणि अनेक मोठ्या शॉपिंग मॉल्समध्ये त्यांच्या शेतात पिकवलेल्या भाज्यांना मोठी मागणी आहे.
आता महिला शेतकरी अनुष्का जयस्वालची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होतीय. विशेष म्हणजे अनुष्का सेंद्रिय पद्धतीने हिरव्या भाज्यांची लागवड करतीय. दरम्यान, तिला फलोत्पादन विभागाकडून ड्रॉप मोअर पीक अंतर्गत 90 टक्के अनुदान मिळाले, त्यामुळे भाजीपाला लागवडीचा खर्च खूपच कमी आहे आणि आम्ही आमच्या पिकांवर अधिक लक्ष देऊ शकलो,” असे तरुण प्रगतीशील शेतकरी अनुष्काने म्हटले. अनुष्काचा आदर्श सध्या उत्तर प्रदेशमधील सर्वच तरुण मुलींसमोर निर्माण झालाय.