मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत आज मुंबईवरून पुन्हा आपल्या गावी मनालीला परतली आहे. मात्र, जाताजाता कंगनाने शिवसेनेवर निशाणा साधला आहे. सोबतच आपल्यासोबत घडलेल्या अन्यायाबाबत मत मांडले आहे. कंगनाने सोशल मीडियावर ट्विट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कंगना म्हणाली कि, ‘जड मनाने मी आज मुंबई सोडत आहे… मी मुंंबईला परत येताना लोकांंनी मला मारायच्या धमक्या दिल्या, माझं घर तोडलं, ऑफिस तोडलं, अशी परिस्थिती आणली की मला माझ्या भोवती सिक्युरिटी घेऊन फिरावं लागलं त्या सगळ्यावरुनच मी मुंंबईची पाकिस्तान व्याप्त काश्मीर अशी केलेली तुलना किती योग्य होती हे दाखवुन दिलंं आहे.’ या आशयाचे ट्विट तिने केले.
With a heavy heart leaving Mumbai, the way I was terrorised all these days constant attacks and abuses hurled at me attempts to break my house after my work place, alert security with lethal weapons around me, must say my analogy about POK was bang on. https://t.co/VXYUNM1UDF
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
तर कंगना आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये म्हणाली, ‘जब रक्षक ही भक्षक होने का एलान कर रहे हैं धड़ियाल बन लोकतंत्र का चीरहरण कर रहे हैं, मुझे कमज़ोर समझ कर, बहुत बड़ी भूल कर रहे हैं! एक महिला को डरा कर उसे नीचा दिखाकर, अपनी इमेज को धूल कर रहे हैं!! या शेरोशायरीतून कंगना राणावतने महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.
चंडीगढ़ मे उतरते ही मेरी सिक्यरिटी नाम मात्र रह गयी है, लोग ख़ुशी से बधाई दे रेही हैं, लगता है इस बार मैं बच गयी, एक दिन था जब मुंबई में माँ के आँचल की शीतलता महसूस होती थी आज वो दिन है जब जान बची तो लाखों पाए, शिव सेना से सोनिया सेना होते ही मुंबई में आतंकी प्रशासन का बोल बाला।
— Kangana Ranaut (@KanganaTeam) September 14, 2020
दरम्यान, कंगना विरुद्ध शिवसेना असा वाद मुंंबईत काही दिवस प्रचंंड चर्चेत होता अजुनही त्यावर उत्तर असे समोर आलेले नाही, याच पार्श्वभुमीवर काल कंंगनाने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांंची भेट घेतली होती.
Maharashtra: Actor Kangana Ranaut leaves from her residence for Mumbai Airport. pic.twitter.com/lnzPneAshP
— ANI (@ANI) September 14, 2020