नवी दिल्ली – करोना संकट हे दैवी संकट आहे. त्यामुळे जीएसटी संकलनात मोठी घट झाल्याचे गुरुवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जीएसटी परिषदेत सांगितले. निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यावर सर्वच स्तरावरून टीका करण्यात आली आहे. अशातच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी सीतारामन यांना ‘मेसेंजर ऑफ गॉड’ म्हणत टीका केली आहे.
पी. चिदंबरम म्हणाले कि, जर हे दैवी संकट आहे तर २०१७-१८, २०१८-१९ आमो २०१९-२० दरम्यान अर्थव्यवस्थाच्या अयोग्य व्यवस्थापनाचे वर्णन कसे कराल? ‘मेसेंजर ऑफ गॉड’ म्हणून अर्थमंत्री काय उत्तर देणार? असा प्रश्न त्यांनी सीतारामन यांना विचारला आहे.
जीएसटी भरपाईतील तूट कमी करण्यासाठी मोदी सरकारने राज्यांना दोन पर्याय दिले तर ते स्वीकारायला नकोच. पहिल्या पर्यायात राज्यांना भरपाई उपकरांतर्गत त्यांच्या भावी पावती तारण ठेवून कर्ज घेण्यास सांगितले जाते. याचा आर्थिक भार संपूर्णपणे राज्यांवर पडतो.
तर, दुसर्या पर्यायांतर्गत राज्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेण्यास सांगितले आहे. हे केवळ वेगळ्या नावाने अधिक कर्ज दिले जाते. यानंतर संपूर्ण आर्थिक भार पुन्हा राज्यांवरच पडतो. केंद्र सरकार आर्थिक जबाबदारीपासून स्वत: ला दूर ठेवत आहे. हा विश्वासघात असून कायद्याचे थेट उल्लंघन आहे, असेही पी. चिदंबरम यांनी म्हंटले आहे.
दूसरे विकल्प के तहत, राज्यों को आरबीआई विंडो से उधार लेने के लिए कहा जाता है। यह मुख्य तौर पर बाजार उधार है, केवल इसका नाम अलग है। फिर, संपूर्ण वित्तीय बोझ राज्यों पर पड़ता है।
— P. Chidambaram (@PChidambaram_IN) August 29, 2020
दरम्यान, निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली आज जीएसटी परिषदेची एकेचाळीसावी बैठक झाली. वस्तू आणि सेवा कराच्या भरपाईपोटी राज्यांना 2 लाख 35 हजार कोटी रुपयांची रक्कम रिझर्व बॅंकेचा सल्ला घेऊन कर्जाच्या स्वरुपात उभारता येऊ शकेल, असे सीतारामन यांनी बैठकीनंतर सांगितले.