अमरावती – अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष बबलू देशमुख यांच्या सहकार पॅनलने बाजी मारत 21 पैकी 13 जागांवर विजय मिळवला आहे. तर बच्चू कडू यांच्या परिवर्तन पॅनलचा पराभव झाला आहे.
या विजयासह यशोमती ठाकूर यांनी बँकेवर आपली सत्ता अबाधित ठेवलेली आहे. जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सातशे कोटी गुंतवणूक प्रकरणी सव्वातीन कोटी रुपयांची दलाली खाल्ल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रचार परिवर्तन पॅनलने सातत्याने केला होता.
दरम्यान सहकार पॅनलला निवडणुकीत 13 जागा मिळाल्या असल्या तरी सत्ता अजुन स्थापन व्हायची आहे. राजकारणात कधीही गुणाकार बेरीज होऊ शकते. बँकेत पुढच्या काळात गैव्यवहार होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊ असं देखील राज्यमंत्री बचू कडू यांनी सागितलं आहे.
निवडणुकीचा निकाल
एकूण जागा 21
सहकार पॅनल – 13
परिवर्तन पॅनल – 5
अपक्ष – 3