मुंबई : कोरोनाचे चार संशयित सापडल्याने मुंबईच्या वरळी कोळीवाडा परिसर सील करण्यात आला. या चारमधील तीन जण एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. राज्याचे पर्यटनमंत्री आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांचा हा मतदार संघ असल्याने ते येथील घडामोडीची माहिती घेत आहेत. दरम्यान 60 जणांचे विलगीकरण करण्यात आले आहेत.
सायंकाळपर्यंत तेथे महापलिाकेच्या अग्णिशामक दलातर्फे तेथे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. तर पोलिसांनी कोळीवाड्यात येणारे सारे रस्ते सील केले आहेत. या दोन दिवसांत या संशयितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आले आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणांसह पोलीस प्रशासन हाय ऍलर्टवर आहेत. कोळीवाड्यात जाण्यासाठी पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. तसेच कुणाला बाहेरही येऊ दिले जात नाही, अशी माहिती मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून दिली आहे.
वरळी कोळावाडा परिसरात काल संशयित रुग्ण आढळल्याने पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रात्रीच हा परिसर सील केला होता. कोणालाही घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आले. त्यानंतर महापालिका प्रशासनाने इथे निर्जंतुकीकरण मोहीम हाती घेतली. त्यानंतर सोमवारी (30 मार्च) वरळीतील कोळीवाडा इथे संशयित रुग्णांचा आकडा वाढला. त्यामुळे आधीच बंद केलेल्या कोळीवाड्यात आणखी खबरदारी घेण्यात आली. कोळीवाड हा प्रचंड दाटीवाटीने लोकवस्ती असलेला परिसर आहे. येथे बैठ्या चाळीत नागरिक राहतात. त्यामुळे येथे करोनाचा संसर्ग झाल्यास मुंबईवरील करोनाचा धोका अनेक पटीने वाढण्याची शक्यता आहे. हाच धोका लक्षात घेऊन संशयित रुग्ण आढळल्यानंतर महापालिका प्रशासनासह इतर यंत्रणा ऍलर्ट झाल्या आहेत.
या परिसरात अत्यंत काटेकोरपणे निर्जंतुकीकरण फवारण्या करण्यात येत आहेत. या परिसरात गेलेल्या पोलिसांच्या गाड्यांवरही निर्जंतुकीकरण फवारण्या केल्या जात आहेत. दरम्यान, कोळीवाडा येथे करोना संशयित सापडल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. तेथील नागरिक हा संसर्ग रोखावा अशी मागणी करत आहेत.