नवी दिल्ली – ओबीसींच्या संबंधात ज्येष्ठ भाजप नेत्या उमा भारती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की महिलांच्या आरक्षण विधेयकात ओबीसींसाठी आरक्षण लागू होणे आवश्यक होते, पण ते झालेले नाही. ओबीसी आरक्षणाशिवाय आम्ही महिला आरक्षण लागू करू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. ओबीसींचे कार्ड खेळत उमा भारत यांनी भाजपच्याच विरोधात बंडाचा झेंडा फडकावला आहे असे मानले जात आहे.
पत्रकारांशी बोलताना त्यांनी म्हटले आहे की देशाच्या निम्म्या लोकसंख्येचे मी प्रतिनिधीत्व करीत आहे. त्यामुळे आम्ही महिलांना संसदेत 33 टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव मान्य केला आहे.
पण जो पर्यंत त्यात ओबीसींसाठी आरक्षण ठेवले जात नाहीं तो पर्यंत मी हे विधेयक लागू करू देणार नाही. मध्यप्रदेशात महिलांना 50 टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे केली आहे. या संबंधात त्यांनी मंगळवारी पतंप्रधान मोदींना उद्देशून पत्रही लिहीले आहे.