India vs Australia 2ND ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गडी गमावून 399 धावा केल्या.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये पावसाने 7.24 वाजता व्यत्यय आणला होता. मैदान पूर्णपणे कव्हरने झाकले गेले होते.पावसामुळे सामना थांबवण्याची ही दुसरी वेळ होती.खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने नऊ षटकांत दोन बाद 56 धावा केल्या होत्या.त्यानंतर पाऊस थांबल्यानंतर मैदान सुकावल्यानंतर 8.35 वाजता पुन्हा खेळ सुरू करण्यात आला.
डकवर्थ लुईस नियमानुसार ऑस्ट्रेलियाला नवे लक्ष्य मिळालं. आता त्याचे लक्ष्य 50 षटकांत 400 धावांवरून 33 षटकांत 317 धावा असे झालं आहे.पावसामुळं (7.24PM) खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियानं नऊ षटकांत दोन गडी बाद 56 धावा केल्या होत्या. आता डकवर्थ लुईस नियमानुसार कांगारू संघाला उर्वरित 24 षटकांत 261 धावा कराव्या लागणार आहेत.
याआधी दुसऱ्या षटकात नऊच्या धावसंख्येवर ऑस्ट्रेलियाला दोन धक्के बसले. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने मॅथ्यू शॉर्टला अश्विनने थर्ड मॅनकडे झेलबाद केले. त्याला आठ चेंडूंत नऊ धावा करता आल्या. यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने कर्णधार स्टीव्ह स्मिथला स्लीपमध्ये शुभमन गिलकडे झेलबाद केले. स्मिथला खातेही उघडता आले नाही.