पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, या मागणीसाठी पिंपरी चिंचवड शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने मनपा भवनावर जन आंदोलन करत हंडा मोर्चा काढला. या वेळी महिलांनी प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या.
या वेळी शहर महिला कॉंग्रेसच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात धरणे आंदोलन केले. माजी नगरसेविका निर्मला कदम, ज्येष्ठ नेत्या निगार बारसकर, प्रियांका कदम, दिपाली भालेकर, डॉ. मनिषा गरुड, छाया देसले, निर्मला खैरे, शिल्पा गायकवाड, सुप्रिया पोहरे, आशा भोसले, प्रियांका मलशेट्टी सादिया शेख आदींसह शहरातील विविध भागातून कॉंग्रेसच्या महिला उपस्थित होत्या.
सायली नढे म्हणाल्या की, पवना धरणात अद्यापही मुबलक पाणीसाठा शिल्लक आहे. तरी प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांना पाणी समस्या भेडसावत आहे. या वेळी आयुक्त राजेश पाटील यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यावर आयुक्त राजेश पाटील यांनी पुढील 15 दिवसांत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी कळविले.