Women Asia Cup – महिला आशिया चषकातील १५वा सामना भारत आणि यजमान बांगलादेश यांच्यात खेळाला गेला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना बांगलादेश समोर १६० धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात यजमान संघ १०० धावांवरच गारद झाला. त्यामुळे भारतीय संघाने हा सामना ५९ धावांनी खिशात घातला. भारताकडून शेफाली वर्माने अष्टपैलू कामगिरी करत संघाच्या विजयात मोलाचा वाट उचलला. या विजयासह भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
भारताने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या बांगलादेश संघाच्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. संपूर्ण सामन्यात ( Women Asia Cup ) यजमान संघाने अत्यंत संथ गतीने फलंदाजी केली. एकवेळ यजमान संघाची १४ षटकांत फक्त ६८ अशी धावसंख्या होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच सामन्यावर मजबूत पकड ठेवली आणि सामना जिंकला.
बांगलादेश संघाकडून निगर सुलताना हिने सर्वाधिक ३६ धावा केल्या तर फरगानाला ३० धावा काढता आल्या. भारताकडून गोलंदाजीत दीप्ती शर्मा आणि शफाली वर्माने यांनी प्रत्येकी २-२ गडी बाद केले तर स्नेह राणा आणि रेणुका सिंग यांनी प्रत्येकी १-१ गडी बाद केला.
सामन्याच्या ( Women Asia Cup ) सुरुवातीला भारताची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतेला. सलामीवीर शेफाली वर्मा आणि कर्णधार स्मृती मंधाना यांनी डावाची सुरुवात चांगली केली आणि पहिल्या गड्यासाठी ९६ धावांची भागीदारी रचली. शेवटी संघाच्या फलंदाजीत पडझड झाली मात्र जेमिमाह रॉड्रिग्जने ३५ धाव करत संघाची धावसंख्या १५०च्या पार पोहोचवली. बांगलादेशाकडून गोलंदाजीत रुमाना अहमदने सर्वाधिक ३ गडी बाद केले.
India back to winning ways in the #WomensAsiaCup2022 👏
Scorecard: https://t.co/egcKxhjLAB pic.twitter.com/aquiD32eM3
— ICC (@ICC) October 8, 2022
भारतीय संघाने साखळी फेरीतील ४ सामने जिंकले असून एक सामना गमावला आहे, तर एक सामना अजून खेळाचा आहे. संघाला साखळी फेरीतील शेवटचा सामना थायलंडशी खेळायचा आहे. भारतीय संघ सध्या स्पर्धेच्या ( Women Asia Cup ) गुणतालिकेत पहिल्या स्थानावर विराजमान आहे. त्याचबरोबर भारताने बांगलादेश विरुद्धच्या विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.