रामपूर (उत्तर प्रदेश) – सुमारे सात वर्षांपूर्वी झालेल्या लग्नानंतर काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये खडाजंगी झाली. यानंतर महिलेने आपल्या माहेरी जाऊन पती आणि सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला.
आता शुक्रवारी पती-पत्नी या खटल्याच्या सुनावणीसाठी रामपूर तहसील येथील ग्रामीण न्यायालयात आले असता, महिलेने पतीसोबत जाण्याचा हट्ट धरला आणि दुरावा क्षणात संपुष्टात आला.
न्यायालयात पतीला पाहताच या महिलेने त्याचा हात पदराने बांधला आणि पतीला कधीच सोडणार नसल्याची ग्वाही दिली. पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर दोघेही राजी होऊन आपापल्या घरी गेले.
शाहबाद कोतवाली भागातील एका गावात राहणाऱ्या एका महिलेचा विवाह मुरादाबादच्या बिलारी पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात राहणाऱ्या तरुणाशी २०१७ मध्ये झाला होता.
लग्नानंतर काही दिवसांतच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की वर्षभरातच पत्नीने पती आणि सासरच्यांविरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा दाखल केला. ती माहेरी आली. त्यानंतर पोटगीचा दावाही दाखल करण्यात आला. सर्व प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत.
याप्रकरणी पती-पत्नी शुक्रवारी शाहबादला पोहोचले होते. दरम्यान, पत्नीने पतीसोबत सासरच्या घरी जाण्याचा हट्ट धरला. पतीने तिला सासरच्या घरी नेण्यास नकार दिला. या प्रकरणावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.
मग पत्नीने पतीचा हात पदराने बांधला आणि आता तुमच्या सोबतच जाईन, असे सांगितले पण पती तिला सोबत घेण्यास तयार नव्हता. अनेक तास हा गोंधळ सुरूच होता. दोघेही एकमेकांवर आरोप करत होते.
नंतर पती-पत्नी एसडीएम सुनील कुमार यांच्याकडे पोहोचले. यानंतर माहिती मिळताच पोलिसही पोहोचले आणि दोघांनाही पोलिस ठाण्यात आणले.
कोतवाल ओंकार सिंह यांनी सांगितले की, पत्नीने पतीच्या भावाविरुद्ध हुंडा कायदा, भरणपोषण, घरगुती हिंसाचार आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी ती पतीसोबत जाण्यावर ठाम होती. नंतर दोघांनाही समजावले असता त्यांनी होकार दिला. महिला तिच्या माहेरी गेली आणि तरुण आपल्या घरी गेला.
हा सगळा गदारोळ झाल्यानंतर तरुणाने आपले लग्न सदर महिलेशी फसवणुकीने लावल्याचे सांगितले. सासरच्यांनी दुसरीचाच फोटो दाखवला होता, पण लग्न भलत्याच मुलीसोबत ठरवले होते. मात्र, महिलेने हे आरोप फेटाळून लावले.