नवी दिल्ली – भाजप खासदार वरुण गांधी सध्या विविध मुद्द्यांवरून आपल्या सरकारवर निशाणा साधताना दिसून येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते सतत ट्वीट करत केंद्रातील मोदी सरकारच्या कामांबाबत प्रश्न उपस्थित करत आहेत. त्यांनी पुन्हा ट्वीट करत “नमामी गंगा मोहिमे”वरुन सरकारवर निशाणा साधला आहे. “11 हजार कोटी रुपये खर्च करूनही गंगा नदी प्रदुषित का आहे? याला जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला आहे.
‘गंगा आपल्यासाठी फक्त नदी नाही तर ‘आई’ आहे. आई गंगा करोडो देशवासीयांच्या जीवनाचा, धर्माचा आणि अस्तित्वाचा आधार आहे. त्यामुळे नमामी गंगेसाठी २० हजार कोटी रुपयांचे बजेट पास करण्यात आले होते. आतापर्यंत ११ हजार कोटी रुपये खर्च करूनही नदीचे प्रदूषण का होत आहे? असा सवाल वरुण गांधी यांनी विचारला आहे.
लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा – मुख्यमंत्री शिंदे
ट्वीटमध्ये त्यांनी एक व्हिडिओही जोडला आहे. या व्हिडिओमध्ये गंगेत मृत्युमूखी पडलेले मासे दाखवण्यात आले आहेत. ‘गंगा ही जीवनदाता आहे, मग दूषित पाण्यामुळे मासे का मरतात? ही जबाबदारी कुणाची? असेही वरुण गांधींनी विचारले आहे.
संसदेच्या कामकाजामध्ये अडथळा; विरोधी पक्षांचे 19 खासदार निलंबित