नवी दिल्ली – उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरीमध्ये झालेल्या हिंसाचाराचे तीव्र प्रतिसाद देशभरात उमटत आहेत. या हिंसाचारासंदर्भात केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आशिष मिश्राच्या अटकेची शेतकरी नेत्यांनी मागणी केली होती. दरम्यान, आशिष मिश्रासह शेतकऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच प्रकरणात मंत्री अजय मिश्रा यांनी महत्वाची कबुली दिली आहे.
या घटनेवरून विरोधी पक्षाने मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. यातच या घटनेवर भाजप खासदार वरुण गांधी यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला आहे. त्यांनी ट्विटवर व्हिडियो शेअर करत आपलं मत मांडल आहे.
काय आहे वरुण गांधी यांचं ट्विट
The video is crystal clear. Protestors cannot be silenced through murder. There has to be accountability for the innocent blood of farmers that has been spilled and justice must be delivered before a message of arrogance and cruelty enters the minds of every farmer. 🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/Z6NLCfuujK
— Varun Gandhi (@varungandhi80) October 7, 2021