नवी दिल्ली – देशात फुकटचे रेवडी वाटप धोरण परडणारे नाही, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यावर भाजपचेच खासदार वरुण गांधी यांनी जोरदार आक्षेप घेतला असून त्यांनी म्हटले आहे की, “मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत भ्रष्ट व्यावसायिकांचे तब्बल 10 लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. हे फुकटचे रेवडी वाटप नाही काय”, असा सवालही त्यांनी केला आहे.
मेहुल चोक्सी आणि ऋषी अग्रवाल हे “मुफ्त की रेवडी” मिळविणाऱ्यांच्या यादीत अग्रस्थानी आहेत, गांधी यांनी हिंदीत ट्विट करून, सरकारकडून बॅंकांना बुडवणाऱ्या दहा व्यावसायिकांची जी यादी जाहीर करण्यात आली आहे, ती यादी त्यांनी या ट्विटर संदेशात जोडली आहे.
“आमचाही हात कोणीही बांधला नाही, यापुढे हल्ला कराल तर…”
त्यात चोक्सी आणि अग्रवाल यांच्या मालकीच्या कंपन्यांचा समावेश आहे आणि त्यांचीच कर्ज मोदी सरकारने माफ केली आहेत. पाच किलो धान्य मिळाल्यावर गरिबांनी आभार मानावेत, अशी अपेक्षा करणारी संसदही गेल्या पाच वर्षांत भ्रष्ट उद्योगपतींची 10 लाख कोटी रुपयांची बुडीत कर्जे माफ झाल्याचे म्हणते हा काय प्रकार आहे, असा सवाल त्यांनी केला असून सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार कोणाचा? असा प्रश्नही वरुण गांधी यांनी मोदी सरकारला विचारला आहे.
हिंगोली: शिक्षकाची विष पिऊन शाळेच्या मैदानावर आत्महत्या; सरपंच, मुख्यध्यापकांसह 12 जणांवर गुन्हा