मुंबई – एसएस राजामौलीचा बहुप्रतिक्षित चित्रपट आरआरआर थिएटरमध्ये प्रदर्शित होताच या चित्रपटाने 1 हजार कोटींहून अधिक बॉक्स ऑफिस कमाई केली आहे. या चित्रपटाच्या यशांनंतर नुकतीच साऊथ सुपर स्टार ज्यू एटीआर आणि राम चरणने ‘RRR’ची सक्सेस पार्टी मुंबईत सेलेब्रेट केली.
या पार्टीची चर्चा सध्या सर्वीकडे होत असून या पार्टीत टॉलिवूड आणि बॉलीवूडमधील अनेक मोठमोठे चित्रपट निर्माते, अभिनेते आणि दिग्दर्शकही उपस्थित होते. या चित्रपटाने बॉलीवूडच्या तिन्ही खानच्या चित्रपटांना पछाडलं आहे. यावरूनही सोशल अशीही चर्चा सुरु आहे की परंतु साऊथ चित्रपटांना इकडे जितकं प्रेम मिळतं, तितकं साऊथमध्ये बॉलिवूड चित्रपटांना मिळत नाही.
याच चर्चांवर राम चरण याला मीडियाने प्रश्न विचारला की,बॉलिवूडच्या चित्रपटांचे साऊथमध्ये कौतुक का होत नाही? तर साऊथचे चित्रपट नॉर्थमध्ये का आवडतात?. या प्रश्नवर तो म्हणाला, ‘मला हिंदी चित्रपटसृष्टीतील एका दिग्दर्शकाने पेन इंडिया चित्रपट बनवून दक्षिणेतही दाखवावा अशी माझी इच्छा आहे.’
राम चरण ने पुढे सलमान खानच्या ट्विटचे संदर्भ देत सांगितले,”मला राम, राजामौली आणि तारक यांचं काम आवडतं. परंतु दक्षिण राज्यांमध्ये आमच्या चित्रपटांचं कौतुक का होत नाही? सलमान खानने हे ट्विट केले होते.
सलमान खान यांचा मुद्दा अगदी स्पष्ट आणि प्रामाणिक आहे. पण माझा विश्वास आहे की यात सलमानचा दोष नाही किंवा कोणत्याही चित्रपटाचा दोष नाही, ‘आमचे चित्रपट तिकडेच पाहिले जाणार’ किंवा ‘इकडेच पाहिले जाणार’ ही स्क्रिप्ट आणि दिग्दर्शकाची विचारसरणी आहे… या सीमा ओलांडल्या पाहिजेत, आमचा चित्रपट सर्वत्र दिसेल’.
तो पुढे म्हणाला,’मला नक्कीच एक असा भारतीय चित्रपट बनवायचा आहे जिथे मला बॉलिवूडमधील टॅलेंटसोबत काम करायचे आहे.’ असं म्हणत त्याने या चर्चांवर आपल मत मांडलं.