समुद्रात अनेक महाकाय जहाजे जेव्हा प्रवास करत असतात तेव्हा असे वाटते की ही जहाजे समुद्राशी समाना करण्यासाठी त्यावर स्वार झालेली आहेत. प्रत्यक्षात मात्र आकाराने महाकाय असलेली ही जहाजे समुद्राच्या एका लाटेच्या फटक्याने उलटतात तेव्हा मात्र स्वतःच्या वजनाने समुद्राच्या तळाशी जाऊन विसावतात. या महाकाय जहाजांवर विविध प्रकारचा माल चढवून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे नेण्यात येतो. त्यामध्ये पोलाद, अल्युमिनियम सारखे धातू आणि खनिज असलेली माती, कच्चे तेल, सिमेंट अशा अनेक वस्तू जहाजावर चढवून त्यांची वाहतूक केली जाते.
अनेकदा या जहाजावर लादण्यात आलेल्या मालामुळेच जहाजे बुडतात. कमकुवत होण्याची प्रक्रिया आजपर्यंत पृथ्वीच्या पाठीवर लाखो जहाजे समुद्रात बुडालेली आहेत. एका अंदाजानुसार दरवर्षी साधारणपणे दहा मोठी मालवाहू जहाजे समुद्रात बुडतात. त्यावरील कर्मचारी मरण पावतात. मालवाहतकू जहाजांमध्ये धातू, धातूमश्रित माती भरली जाते त्याचा आणि समुद्रावरील हवामानाच जहाजासाठी वापरलेल्या मटेरियलशी रासायनिक प्रक्रिया होत राहते. या रासायनिक प्रक्रियेला लिक्विफॅक्शन असे म्हटले जाते. त्यामुळे जहाजे कमकुवत होत जातात. 2015 मध्ये 65 हजार टन वजनाचे ज्युपिटर नावाचे जहाज व्हिएनतामच्या जवळ समुद्रात बुडाले. त्यावरील 19 कर्मचाऱ्यांपैकी एकजण वाचला. या अपघातानंतर इंटरनॅशनल मेरिटाईम ऑर्गनायझेशन (आयएमओ) जहाजावंर लादल्या जाणाऱ्या अल्युमिनियमच्या खनिजांबाबत इशारावजा सूचना जारी केली होती.
माल चढवताना होणाऱ्या चुका
मालवाहूतक जहाजांवर माल चढवताना खास खबरदारी घेण्याची गरज असते. विशिष्ट पद्धतीने काळजी घेऊन माल चढवावा लागतो. अनेकदा यासंदर्भातील
नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. या दुर्लक्षामुळे जहाजाच्याखाली पाणी जोराने उसळ्या घेते. त्यामुळे खनिज पोलाद इकडेतिकडे हलूलागते. त्याचा परिणाम जहाजाच्या संतुलनावर होतो. पाण्याचा दाब वाढला तर अनेकदा जहाजावरील सगळा माल एका बाजूला घसरतो. ते पुन्हा जागेवर आणणे शक्य नसते. जहाज एका बाजूला कललेल्या स्थितीत प्रवास करत राहते. काहीवेळा तर जहाज इतके कलते की त्यात पाणी येऊ लागते आणि शेवटी जहाज बुडते. जहाजामध्ये माल चढवण्याच्या पद्धतीत थोडा बदल केला तर असे अपघात रोखले जाऊ शकतात.
त्याचबरोबर जहाजात कोणती खनिजे चढवली जावीत आणि कोणती जाऊ नयेत, त्याचे प्रमाण किती असावे, कोणत्या खनिजांमुळे रासायनिक प्रक्रिया वेगाने होते, विविध समुद्रात पाण्याचा दबाव कसा असतो, या गोष्टींची काळजी घेतली तर समुद्रातील अपघातांचा धोका कमी होऊ शकतो. त्यासाठी मालवाहक जहाजातील कर्मचाऱ्यांनी कायम सतर्क राहणे आवश्यक असते. जेणेकरून जहाजावर जास्त दबाव येऊन ते असंतुलित होणार नाही. सध्याच्या काळात त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. जहाजांवरील पाण्याचा दबाव समजण्यासाठी सेन्सरचा वापर केला जातो.