नवी दिल्ली – भारताची अव्वल कुस्तीपटू बबिता फोगट हिने आता नव्या वादाला तोंड फोडले आहे. देशाच्या क्रीडाक्षेत्राचा सर्वात मानाचा समजला जाणारा खेलरत्न पुरस्कार माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या नावाने का दिला जातो, अशी विचारणा तिने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टमुळे बबिता कायम चर्चेत येत आहे. आता पुन्हा एकदा ती चर्चेत आली असून बबिताने तिच्या खोचक पद्धतीने एक ट्विट केले आहे.
राजीव गांधी यांनी एकदा भारतातून इटलीत भाला फेकला होता म्हणून खेलरत्न पुरस्कार त्यांच्या नावाने दिला जातो का? अशी विचारणा तिने केली व त्यावर हजारोंनी लाइक्स आल्या.
बबिताने दशाचे प्रतिनिधित्व करताना राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तीन पदके पटकावली आहेत. त्यात 1 सुवर्ण व 2 रजतपदकांचा समावेश आहे. तिची बहीण विनेश फोगट हिला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मात्र, तिला करोनाची बाधा झाल्याने पुरस्कार स्वीकारता आला नाही.