मुंबई – मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचं निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. मिळलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यात एका फ्लॅटमध्ये मृतावस्थेत ते आढळले. फ्लॅट मधून दुर्गंधी येत असल्याने लोकांनी पोलिसांना कळवले. तर सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल होताच अनेकांनी भाव पूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे, तर नेटकऱ्यांनी मुलगा इतका मोठा स्टार असूनही महाजनी हे तळेगाव दाभाडेला एकटे भाडेतत्त्वावर का राहत होते, असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान आता गश्मीरने इंस्टाग्राम स्टोरीवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने यामध्ये लिहिले आहे की,’एका कलाकाराला कलाप्रमाणे राहू द्या. मी आणि माझे सहकारी शांत राहू…. जरी आम्ही शांत राहून मला / आम्हाला द्वेष आणि शिव्या देत असाल तरी सुद्धा आम्ही कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याचे स्वागत करतो. देव दिवंगत आत्म्यास शांती देवो. ओम शांती…ते माझे वडील आणि माझ्या आईचे पती होते आणि आम्ही त्यांना तुमच्या सर्वांपेक्षा जास्त ओळखत होतो. त्यामुळे जेव्हा योग्य वेळ असेल तेव्हा मी याबद्दल नक्कीच सांगेन आणि बोलेन…’ असं म्हणत त्याने सोशल मीडियावर भूमिका मांडली आहे.
तत्पूर्वी, महाजनी यांचा मुलगा आणि प्रसिद्ध अभिनेता गश्मीर महाजनी मुंबईत राहतो. गश्मीर हा मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतही लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने हिंदी मालिका आणि रिॲलिटी शोजमध्येही भाग घेतला आहे. आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ या चित्रपटात रवींद्र आणि गश्मीर महाजनी एकत्रच झळकले होते. दरम्यान ते एकटे का राहत होते असा प्रश्न आता उपस्थित केला जात होता.