मुंबई – महाविकास आघाडीचे सरकार जाऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार आले. त्यानंतर सुरु झाल्या कोर्टाच्या तारखा, दावे प्रतिदावे आणि पुरावे. शिवसेनेसोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह भाजपसोबत हातमिळवणी केली आणि सरकार स्थापन केलं. शिवसेनेत उभाउ पडली आणि ठाकरे शिंदे गट तयार झाले. दोन्हही गटांनी न्यायालयात दाद मागितली आणि सुनावणी पार पडली. आता या सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. सुनावणीचा निकाल केव्हा येणार याबाबत घटना तज्ञ उल्हास बापट यांनी भाष्य केले आहे.
पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर दोन्हही गटांच्या वकिलांनी आपल्या आपल्या बाजू मांडल्या. आता या सव प्रकरणाला तब्बल महिना उलटून गेला आहे. या निकालानंतर राज्यातील सरकारचे भवितव्य ठरणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने निकालाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. राज्यातील सत्तासंघर्षांवर येत्या ११ मे रोजी निकाल येण्याची शक्यता असल्याचा अंदाज घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.
नाना पटोले यांनी देखिल केल भाष्य
“येणारा आठवडा महाराष्ट्रासाठी परिवर्तनाचा ठरणार असून आहे. या आठवड्यात अनेक राजकीय घटना घडतील. जनेतला लुटण्याचे काम आणि 105 सर्वाधिक आमदार येऊन देखील भाजपाने राज्यात तमाशा केलाय” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले होते.
राज्यात न भूतु न भविष्यती असं राजकारण पाहिला मिळाल आहे.शिंदे गटाचे दावे आणि ठाकरे गटाचे दावे इलेकट्रोनिक मीडियाद्वारे थेट महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेने पाहिले आहेत. त्यामुळे या राजकीय बदलाचा निकाल नेमका काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. येत्या काही दिवसांमध्ये सत्ता संघर्षाचा निकाल लागू शकतो असा अंदाज अनेक कायदे अभ्यासक व्यक्त करताना दिसत आहे.