भारतात अशी अनेक रहस्यमय मंदिरे आहेत ज्यांचे रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. एक असे मंदिर आहे, तेथे एकूण ९९ लाख ९९ हजार ९९९ दगडी मूर्ती आहेत. या मंदिराचे गूढ उकलण्यासाठी अनेक विद्वानांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश मिळाले नाही. या मंदिरातील ९९ लाख ९९ हजार ९९९ मूर्ती हे एक गूढ आहे. या दगडी मूर्ती कोणी बनवल्या? या मूर्ती कधी आणि का बनवल्या गेल्या?
इथे एक कोटीमध्ये एकापेक्षा कमी मूर्ती का बनवल्या गेल्या हे सर्वात मोठे गूढ आहे. या मूर्तींबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात. भारतात अशी अनेक मंदिरे आणि मूर्ती आहेत ज्या अत्यंत रहस्यमय आहेत. या मंदिरांमध्ये आणि मूर्तींमध्येही त्याचा समावेश आहे. या मंदिराचे रहस्य जाणून घेण्यासाठी येथे येणाऱ्या भाविकांच्या मनात उत्सुकता आहे. या मूर्तींचे गूढ अद्याप कोणालाही उकलता आलेले नाही. चला जाणून घेऊया या गूढ मंदिराबद्दल…
उनाकोटी मंदिर हे त्रिपुराची राजधानी आगरतळापासून १४५ किमी अंतरावर आहे. भारतातील सर्वात मोठ्या रहस्यमय मंदिरांमध्ये या मंदिराचा समावेश होतो.
या मंदिराबद्दल असे मानले जाते की, एकदा भगवान शिव एक कोटी देवतांसह कुठेतरी जात होते. सर्व देवता झोपी गेले. सकाळी भगवान शिव उठले तेव्हा सर्व देवता झोपलेले होते. हे पाहून महादेवांना राग आला आणि त्यांनी शाप दिला आणि सर्व देवता दगड झाले. यामुळेच इथे ९९ लाख ९९ हजार ९९९ मूर्ती आहेत, असे मानले जाते.
या मूर्तींबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. कालू नावाचा एक कारागीर होता असे म्हणतात. त्याला भगवान शंकर आणि माता पार्वतींसोबत कैलास पर्वतावर जायचे होते. पण ते अशक्य होते. कारागिराच्या आग्रहास्तव भगवान शंकर म्हणाले की, तुम्ही एका रात्रीत एक कोटी देवी-देवतांच्या मूर्ती बनवल्या तर तुम्हाला सोबत घेऊन जाऊ.
यानंतर त्या कारागिराने रात्रभर कष्ट घेऊन मूर्ती तयार केल्या, मात्र एक कोटीतील एक मूर्ती कमी राहिली. या कारणामुळे भगवान शंकरांनी कारागिराला सोबत घेतले नाही. त्यामुळेच या ठिकाणाचे नाव ‘उनाकोटी’ पडल्याचे सांगितले जाते.