जिल्ह्यात सोमवारपासून (ता.27) एकही नवा करोनाबाधित रुग्ण आढळला नाही. हे दिलासादायक चित्र व वातावरण तयार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे “कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’चे काम आहे. जिल्ह्यात प्रथम करोना बाधित सापडल्याबरोबर त्वरित जिल्हा प्रशासनाने केंद्र व राज्य शासनाच्या सूचना व आदेशान्वये सर्वतोपरी प्रयत्न केले. पोलिसांनी आदेशांची कडक व प्रवाही अंमलबजावणी केली. त्यामुळे करोनासारख्या महामारीशी खंबीर लढा देता आला.
या लढ्यात प्रशासनाला बहुमोल मदत जर कोणी केली असेल, तर ती आरोग्य यंत्रणेने. विशे:षता डॉक्टर आरोग्यसेवक, सेविका यांनी स्वत:च्या जिवाची पर्वा न करता रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा समजून कर्तव्य चोख बजावले. रुग्णांसाठी देवदूत तर देशासाठी सैनिकांप्रमाणे या साथीशी खंबीरपणे लढा दिला. विविध. सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेऊन आपापल्यापरीने बहुमोल सहकार्य व मदत केली. प्रारंभी जनमानसात नाराजीचा सूर होता.
तथापि, सर्वांच्या प्रबोधनाच्या प्रयत्नांमुळे जनतेला या साथीचे गांभीर्य व जीवघेण्या संकटाची कल्पना आली. त्यामुळे गैरसोयीकडे दुर्लक्ष करून जनतेने प्रशासनाला प्रतिसाद दिला. त्यामुळे किमान नगरमध्ये करोनाची साखळी तोडण्यात यशस्वी होताना दिसत आहे. जनता व प्रशासनचा एकमेकांवरील विश्वासयात महत्वाचा ठरला. हीच भूमिका सर्वांनी ठेवल्यास लवकरच आपण लॉकडाऊन हटविण्यास पात्र होऊ.
ऍड. रवींद्र शितोळे अध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ अहमदनगर,
संपर्क : 9422221341
माणसाची देवावरची श्रध्दा व भावना हा पूर्वीपासुन कुतूहलाचा विषय राहिला. तस पहायला गेलं, तर या दोन्ही गोष्टी सापेक्ष आहेत. देवाचं स्वरुप निर्गुण निराकार आहे की, मूर्तीमधे दिसते तसं आहे? याचं उत्तर ज्याच त्याच देवत्व मानण्यात आहे. मग देवत्व म्हणजे काय? त्याची उत्तरे अनेक सापडतील. देवत्व म्हणजे आपल्या अशांत मनाला शांतता मिळून देतं.ते देवत्व, अस मला भावलेलं उत्तर आहे. अफाट मोहमाय जगात स्वत्वाची जाणीव करुन देतं ते देवत्व. करोना व्हायरसच्या महामारीने कित्येक देश एका विषाणूमुळे मेटाकुटीला आलेत.
याच काळात स्व:तचे आयुष्य पणाला लाऊन हॉस्पिटलमधे आलेल्या रुग्णांची सेवा करणारे डॉक्टर, परिचारिका व त्यांचे सर्व सहकारी हेच आपले देव झाले. याच काळात आपल्या देवघरातला देव आपल्याला मनःशांती देत आहे, तर हॉस्पीटलमधील पांढऱ्या गणवेशातील देव काळाच्या दारात गेलेल्या रुग्णांची सेवा करुन मानवजातीच रक्षण करत आहे. अन् तिसरा मानवरुपी देव म्हटलं म्हणजे पत्रकार. जीव धोक्यात घालून करोनाचे अपेड्ट कळवतोय. निस्वा:र्थीपणे चालू असलेले सर्वांचेच कष्ट कामाला येत आहेत. या सर्वांचा तारणहार ठरतोय तो जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी. कठीण काळात देखील सर्वांच्या पोटाची काळजी त्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वांच्यात कर्तव्यनिष्ठेला नगरकरांचा सलाम.
राहुल मते ,मिरजगाव, ता. कर्जत.
संपर्क, 9766257171