पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी राज्य सरकारने सुटी जाहीर केली आहे. मंगळवारी (दि. ७) राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील बारामती मतदारसंघाचा समावेश आहे.
या अनुषंगाने बाजार समितीचे जे कर्मचारी, अधिकाऱ्यांचे मतदान बारामती मतदारसंघात आहे. त्यांना सुटी जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांच्या शेतमालाचे नुकसान होऊ नये, यासाठी मार्केट यार्डातील बाजार आवार सुरू राहणार आहे.
शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाची नियमित विक्री होईल, असे परिपत्रक पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी सभापती दिलीप काळभोर यांच्या मान्यतेने काढले आहे.